Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 19, 2024
in राजकीय
0
वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरीच्या सभेतुन आश्वासन

दिंडोरी : इथल्या शिवसेनेच्या खासदाराने संसदेत कधीच मागणी केली नाही की, राफेल विमानांची निर्मिती ओझरच्या एचएएलच्या कारखान्यात करण्यात यावी. या कारखान्यात लढाऊ विमाने बनवायचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथून ‘वंचित’चा उमेदवार निवडून आल्यास या माध्यमातून आम्ही इथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊ, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती ढोमसे यांच्या प्रचारार्थ आयोजित पिंपळगाव बसवंत येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, ओझरमध्ये HAL हा विमान निर्मितीचा शासकीय कारखाना आहे. भारताने राफेल विमान खरेदीचा करार केला होता, तेव्हा 100 विमाने भारतात तयार होतील, असा निर्णय झाला होता. त्यावेळी सर्वांची मागणी होती की, देशभरातील एचएएलच्या कारखान्यात ह्या लढाऊ विमानांची निर्मिती व्हावी मात्र, पंतप्रधान मोदीने हे विमाने बनवायचे कंत्राट अनिल अंबानीला दिले. मात्र, अनिल अंबानीला लढाऊ विमाने बनवायचा कोणताही अनुभव नाही. हा विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे? हेही लोकांनां माहिती नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली.

जो कोणी व्यापारी शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव देईल, त्याला शिक्षा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन देशात केले होते. पण, मोदीने हा कायदा केला नाही. आम्ही सत्तेत आल्यास हा कायदा करू.

कांदा उत्पादकांचे महाराष्ट्र हे आगार आहे. पण, राज्यातील आणि या भागातील शेतकऱ्याला केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडलय. गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी मोदीने देशातील शेतकरी मारला. गुजराती शेतकऱ्याला कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आणि महाराष्ट्रातील शेतकरी मारला.

भाव खाली – वर करणे हे व्यापारी आणि सरकारचा खेळ आहे. मालतीताई दिंडोरी मतदारसंघातून निवडून आल्यास सर्वात आधी कांद्याचे धोरण ठरवतील.

काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव 15 रुपये किलोवरून 150 रुपये किलोपर्यंत अचानकपणे गेले होते. हा कृत्रिम तुटवडा व्यापाऱ्यांनी निर्माण केला होता. यातून व्यापाऱ्यांनी 45 हजार कोटी रुपये काही महिन्यात सामान्य लोकांकडून लुटले.

हा तुटवडा सरकारमान्य होता. त्याचा पैशांतून ते मतं विकत घ्यायची गोष्टी करताय.

मोदी देशाचा पंतप्रधान आहे की गुजरातचा ?

कांदा प्रश्नी सरकार निर्यात धोरण आखत नाहीये. गुजरातमधील व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे आणि देशातील इतर व्यापारी, शेतकरी मरायला सोडला. मोदी देशाचा पंतप्रधान आहे की गुजरातचा आहे? ज्याने फक्त गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा केला.


       
Tags: DindoriLoksabhaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

काँग्रेसच्या साजिद पठाण खानविरोधात तक्रार दाखल

Next Post

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

Next Post
शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 
बातमी

‘ठाणे की रिक्षा…’ गाण्यातून वाद! कुणाल कामरा विधानभवनात हजर, पण सुनावणी लांबणीवर 

by mosami kewat
February 17, 2026
0

मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी आज कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनाच्या हक्कभंग समितीसमोर हजर...

Read moreDetails
अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

February 17, 2026
डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

February 17, 2026
जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

February 17, 2026
अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

February 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home