Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 22, 2025
in बातमी
0
'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

       

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून गाजत असलेल्या ‘रम्य’ प्रकरणावरून आज वंचित बहुजन आघाडीने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री कोकाटे पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण तापले आहे.
‎
‎वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “विधानभवनात महाराष्ट्र सरकार नावाचा ‘गेम’ सुरू आहे की काय अशी शंका आता जनतेला वाटू लागली आहे,” असे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी म्हटले. जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर सरकार निर्णय घेत असताना कृषीमंत्र्यांनी सभागृहात ‘रमी’ सारखा खेळ खेळणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गांभीर्य धुळीस मिळवणारे आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.
‎
‎’रमी’ की ‘डुम्मी’?

‎पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी “मी खेळत नव्हतो, मी स्किप करत होतो,” असे स्पष्टीकरण दिले होते. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीने कोकाटे यांच्या स्पष्टीकरणाची खिल्ली उडवली. “जनतेने हेही पाहिलं की त्यांनी कुठला पत्ता टाकला,” असे म्हणत, एका नागरिकाने केलेल्या “काय खोटं बोलता राव! तुम्ही तर उघड उघड एक्का टाकला,” या टिप्पणीचा संदर्भ दिला. तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की झूम करून काय चालले आहे हे दिसते, त्यामुळे कोकाटे जनतेला वेड्यात काढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
‎
‎’जुगार क्रांती’ नव्हे, ‘श्वेत क्रांती’ची गरज
‎
‎सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. मराठवाड्यात खताचा तुटवडा ही मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत कृषीमंत्र्यांनी सभागृहात पत्ते खेळणे म्हणजे त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही हेच दिसते, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले. “आजपर्यंत कृषी मंत्र्यांनी, राजकीय नेत्यांनी देशात श्वेत क्रांती केली, हरित क्रांती केली, पण दुर्दैवानं महाराष्ट्रात जुगार क्रांती केली जाते असं म्हणायची वेळ आली आहे,” अशी घणाघाती टीकाही यावेळी करण्यात आली.
‎
‎वंचित बहुजन आघाडीने विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आणि ज्यांनी व्हिडिओ शूट केला आहे त्यांच्याकडून पूर्ण फुटेज मागवून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. “दूध का दूध, पाणी का पाणी” होऊन सत्य समोर यावे आणि कोकाटे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.
‎
‎मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेने दिलेल्या शुभेच्छांचा संदर्भ देत, वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्या जागी शेतीची जाण असलेला सक्षम मंत्री नेमावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
‎
‎केवळ ‘चूक आहे’ म्हणणे पुरेसे नाही
‎
‎मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर “हे चूक आहे” अशी प्रतिक्रिया दिली असली तरी, केवळ असे म्हणणे पुरेसे नाही, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले. जनतेनं रस्त्यावर उतरायचं, जनतेनं केसेस घ्यायचे, आणि तुम्ही वाचवणार एक पत्ते खेळणारा मंत्री?” असा सवाल करत, सरकारने आपले चारित्र्य तपासावे असे आवाहनही केले.

‎शेवटी, कृषीमंत्र्यांनी सभागृहात मंत्रीपदावर बसून जनतेच्या जीवाशी खेळू नये, असे म्हणत त्यांना घरी पाठवून २४ तास ‘रमी’ खेळण्यास सांगितले. ही लढाई प्रामाणिकपणे सर्व पातळ्यांवर लढली जाईल, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले.


       
Tags: Maharashtra Agriculture Ministerrummyvbaforindiaमाणिकराव कोकाटे
Previous Post

प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

Next Post

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

Next Post
नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
बातमी

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

by mosami kewat
August 22, 2026
0

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home