Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी ‘वंचित’ चे पंतप्रधान मोदींना निवेदन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 23, 2024
in बातमी
0
शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी ‘वंचित’ चे पंतप्रधान मोदींना निवेदन
       

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास वंचितचा पाठिंबा !

गडचिरोली: भारतातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजधानी दिल्लीमध्ये परत एकदा देशातील शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे ती “किमान आधारभूत किंमत” हा त्यांचा हक्क मानला जावून ती देण्यास सरकार बांधील आहे असा कायदा केला जावा.

परंतु सरकारला हे मान्य नाही त्यामूळे देशात किमान हमीभाव मिळावा यासाठी तिव्र आंदोलन सुरू आहे, देशातील फक्त सहा टक्के शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळतो हे विदारक सत्य असून आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण होत आहे. केंद्र सरकारने आणि त्याच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामूळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समित्यां बाहेर विकता येणार आहे, पण जर शेतकरी हा शेतमाल बाजार समित्यांबाहेर विकणार असेल तर तिथं त्या मालाची खरेदी सरकारी भावानं होईल याची हमी नाही, किमान हमी भावाचा मुद्दा हा एपीएमसी कायद्यात ज्या तिन दुरूस्त्या केल्या त्याच्याशी निगडीत आहे या तिन्ही कायद्यामूळे शेतकऱ्यांसमोर धोके निर्माण झाले आहेत.

शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळावा आणि त्या हमी भावाची कडक अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने ज्या एपीएमसीच्या आवारात हमीभावापेक्षा कमी किंमतीने खरेदी होईल त्या मार्केट कमिटीच्या संचालका विरूध्द कायदेशीर कारवाई करावी, तसेच व्यापारी अथवा अडत्या दोषी असल्यास त्यांना तुरूंगवास व आर्थिक दंड करावा आणि त्यासाठी कायदा तयार करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे.

यावेळी, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, सोशल मिडीया प्रमुख जावेद शेख, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर संगटक विपीन सूर्यवंशी, वासूदेव मडावी, किशोर जाधव, कैलास खोब्रागडे आदि उपस्थित होते.


       
Tags: FarmerfarmersprotestGadchiroliVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मालेगावा तालुक्यात ‘वंचित’ च्या ग्रामशाखेचे उद्घाटन !

Next Post

‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

'मविआ'ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
बातमी

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

by mosami kewat
September 16, 2025
0

मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...

Read moreDetails
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

September 16, 2025
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका

September 16, 2025
मोदी "द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!" ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

September 16, 2025
बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home