अमरावती : यशोदा नगर ते महादेव खोरी या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी (७ ऑगस्ट, २०२५) यशोदा नगर चौकात आंदोलन केले. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात घडत आहेत, तसेच शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येबद्दल वंचित बहुजन आघाडीने २६ जुलै रोजी आंदोलन करून मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या आंदोलनात राहुल मेश्राम (जिल्हाध्यक्ष), शैलेश बागडे (उपाध्यक्ष, युवा आघाडी शहर), विनय बांबोले (जिल्हाध्यक्ष, माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट युनियन), नंदू कुमार खंडारे (जिल्हा उपाध्यक्ष), सौ. रीना प्रशांत गजभिये (उपाध्यक्ष, युवा आघाडी), सौ. बागडे, विजय डोंगरे, राहुल भालेराव, आदेश मेडांगे, अलंकार बागडे, रोहित गवई, प्रमोद राऊत, तंतरपाडे, तायडे, मोहोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नागपूर : नगर पंचायत बहादुरा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचऱ्याचे संकलन दररोज होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे....
Read moreDetails






