वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; 670 विकासकामे लागणार मार्गी
अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील विकासकामांना दिलेली स्थगिती अखेर मागे घेतली असून, जिल्ह्यातील सुमारे 670 विकासकामे मार्गी लागणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सन 2025-26 या वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित कामांना स्थगिती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली होती. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जातींसाठी मंजूर झालेला निधी त्याच कामांसाठी खर्च करणे अपेक्षित असताना, मंजूर कामांना स्थगिती देणे नियमबाह्य असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. (Vanchit Bahujan Aghadi)
स्थगितीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी भाजपा सरकार आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांची मोठी गरज असून उपलब्ध निधी अपुरा पडत असताना विकासकामांना स्थगिती देणे अन्यायकारक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. तसेच, हा निर्णय मागे न घेतल्यास पालकमंत्र्यांविरोधात अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. (Vanchit Bahujan Aghadi)
आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने मंजूर असलेल्या 670 विकासकामांवरील स्थगिती मागे घेतली असून संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील विकासकामांना पुन्हा गती मिळणार आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
खोडसाळपणा खपवून घेणार नाही – सागर भवते
याबाबत प्रतिक्रिया देताना युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी प्रशासनाचे आभार मानले. मात्र, यापुढे अनुसूचित जातींच्या विकासकामांत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...
Read moreDetails






