Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्राथमिक आरोग्य केंद्रे फक्त नावापुरतीच, जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना

प्रबुद्ध भारत by प्रबुद्ध भारत
May 29, 2021
in बातमी
0
प्राथमिक आरोग्य केंद्रे फक्त नावापुरतीच, जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना
0
SHARES
241
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीने ऑक्सिजन बेड ग्रामीण जनतेला मिळावे यासाठी एक कोटी रुपयांची तरतुद केली आहे. जिल्हयात एकुण 42 प्राथमिक आरोग्य केंद्र (PMCs) असुन प्रत्येकी 10 बेड देण्याची व्यवस्था केली आहे, याची टेंडर प्रक्रीया पुर्ण झाली आहे. मात्र सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देखील अध्यापही अंमलबजावणी झाली नाहीये, याचा मुहूर्त कधी लागणार ?


तसे पाहता जिल्हातील लोकसंख्याच्या तुलनेने हे एक कोटीचे बजेट अत्यअल्प व तुटपुंजे आहे. प्रत्यक्षात पहायचे झाले तर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, अपुरी अत्यावश्यक साधने इत्यादी. सद्यपरिस्थितीत इतका प्रचंड ताण असताना यंञणा व्यवस्थीत चालवण्यासाठी तज्ञ मंडळी लागतात त्यांची प्रचंड वानवा. अारोग्य यंत्रणेवर प्रंचड ताण आलेला आहे आणि लसिकरण देखील अर्धवट अवस्थेत आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांसाठीदेखील रुग्णांना प्रचंड झगडावे लागत आहे. सर्वसामान्य जनता मनातील असुरक्षिततेमुळे जीव मुठीत घेऊन जगत आहे – दुसरा पर्याय नाही, करणार तरी काय ?


उदाहरणच घ्यायचे झाल्यास भुम तालुक्यातील आंबी या माझ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एकही ऑक्सीजन बेड नाही, व्हेंटिलेटर तर दुरचीच गोष्ट. इथे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि तज्ञ देखील नाहीत. करोना चाचणी होते आणि पॉसिटीव्ह आढळल्यास रुग्णाला उपचारासाठी ईतर ठिकाणी पाठवावे लागते. मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांची इतक्या मोठ्या प्रमाणावर वानवा असणे ही दुर्दवी बाब आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची देशभर चर्चा होत असताना अामच्याकडे माञ मूलभुत आरोग्य गरजांसाठी अजुनही मारामारच. अशा निरोपयोगी आणि नावपूरत्या आरोग्य केंद्राचा उपयोग काय ? हा खोटा दिलासा जीवघेणा नाहीये का ?
या प्राथमिक केंद्रा अंतर्गत 10-12 खेडी येतात. म्हणजेच साधारण 10 ते15 हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्रावर अवलंबुन आहे. लोक तपासणीसाठी याठिकाणी येत असतात. पण वेळप्रसंगी गरज भासल्यास एकही अँम्बुलन्स येथे नाही. बऱ्याचदा सुविधा नसल्याने रुग्णाला शेजारच्या जिल्हयात हलवावे लागते, नाहीतर कधी कधी उपचाराअभवी रुग्ण दगावतात देखील.

राजकारण्यांची उदासीनता खेदजनक….


ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर बरोबरच कोविड सेंटर उभारणे ही खरी गरज आहे. पण करणार तरी काय आणि कोण ? सगळेच हतबल आहेत कारण हा ताई,दादा,भाउ,तात्या,साहेब,अण्णा यांचा मतदारसंघ नाही ना ! अडगळीत पडलेल्या मतदारसंघाचा कोणाला फायदा ना तोटा. जिल्हातील प्रशासनाचे व राजकीय मंडळीचे सपसेल दुर्लक्ष…लोक मेले काय आणि जगले काय कोणाला घेणेदेणे दिसत नाही… देशभरात उस्मानाबाद येथील ऑक्सीजन प्रकल्पाचे कौतुक जरी होत असले तरी खरी वास्तविकता वेगळी आहे….हे झालंय असं की ऑक्सिजन प्रकल्प उशाला तरी कोरड माञ जिल्हयालाच नव्हे तर मराठवाडयातील जनतेच्या घशाला…!!

कुलदीप आंबेकर

 


       
Tags: covid19kuldipambekarusmanabad
Previous Post

दर्यापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे चिपको आंदोलन

Next Post

मल्ल सुशील कुमारचा कुटिल डाव

Next Post
मल्ल सुशील कुमारचा कुटिल डाव

मल्ल सुशील कुमारचा कुटिल डाव

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

बोधगया, बिहार : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराला भेट दिली. राहुल गांधींच्या महाबोधी मंदिर ...

June 7, 2025
विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?
Uncategorized

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

पुणे - आकाश शेलार भारत-पाकिस्तान संघर्ष असतो तेव्हा देशभरात गर्जना होते ‘जवाब दो, घुसून मारा’ पण जेव्हा देश खरंच घुसून ...

June 7, 2025
राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू
बातमी

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 नवे रुग्ण सापडले असून ...

June 7, 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे
बातमी

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदार व महापालिका अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ईडीने ...

June 7, 2025
रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
बातमी

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

रायगड - किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या ...

June 7, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क