मुंबई : आज सकाळी मुंबईतील बांद्रा पूर्वेकडील भारत नगर परिसरात एक भीषण दुर्घटना घडली. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास चाळ क्रमांक ३७ नावाची तीन मजली इमारत अचानक कोसळली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, ढिगाऱ्याखाली किमान १० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सकाळच्या शांततेत अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने आणि त्यानंतर लोकांच्या आक्रोशाने परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगारा हटवण्यासाठी आठ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.
नागरिकांना शांततेचे आवाहन
चाळ कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. अनेक स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले असून, ते प्रशासकीय मदत कार्यात सहकार्य करत आहेत. प्रशासनाने लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...
Read moreDetails






