Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजिक क्रांती गतीमान करण्याची गरज – बाळू टेंभुर्णे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 8, 2024
in बातमी
0
रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजिक क्रांती गतीमान करण्याची गरज – बाळू टेंभुर्णे
       

गडचिरोली: माता रमाबाई आंबेडकर यांना स्वत:च्या संसारापेक्षा करोडो दिन दलीत लोकांच्या संसाराची चिंता होती, चार-चार पोटच्या लेकरांचे बलिदान दिले, अनेक प्रकारच्या मरणयातना भोगल्या, गरिबीचे चटके सोसले परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्येच्या भूकेत खंड पडू दिला नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला नाही या रमाईच्या त्यागातूनच निर्माण झालेल्या सामाजिक क्रांतीला अधिक गतीमान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी आंबोली येथील रमाई जयंती महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.

बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशिल बौद्ध विहाराच्या प्रांगणात रमाई जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नामदेव मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप बेलखेडे, अशोक उंदिरवाडे, जयाप्रदा रामटेके, करिश्मा गोडबोले आदि उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना टेंभुर्णे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत तर रमाबाई या आमच्या आई आहेत यांनी निर्माण केलेलं राजगृह हेच आमच्या सामाजिक, धार्मिक, राजकिय चळवळीचे माहेरघर आहे त्यालाच केंद्रबिंदू मानणारे कार्यकर्तेच चळवळ जीवंत ठेऊ शकतात असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा समयोचीत भाषण करून रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक रविंद्र काटकर यांनी तर आभार शारदा चुनारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाखा चुनारकर, तेजाबाई उंदिरवाडे, ललिता मेश्राम, कैलास दुर्गे, भास्कर रामटेके यांनी परिश्रम घेतले.


       
Tags: GadchiroliramaiambedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे – रेखाताई ठाकूर

Next Post

‘वंचित’ ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !

Next Post
‘वंचित’ ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !

'वंचित' ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?
बातमी

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

by mosami kewat
April 1, 2026
0

LPG Gas Price Hike : आखाती प्रदेशातील सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आता भारतातील गॅस बाजारावर दिसू लागला आहे. एलपीजी...

Read moreDetails
नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

नवीन नियम लागू! ATM, रेल्वे तिकीट आणि बँकिंग अपडेट्स जाणून घ्या

April 1, 2026
Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

March 31, 2026
Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

March 31, 2026
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

March 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home