सांगली –
मुंबई महापालिका निवडणुुकिच्या पार्शभुमीवर सध्या राज्यात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र ठाकरे बंधु हे वेगळे का झाले, तर त्यांच्या दोन बायंकाच्या भांडणामुळे ते वेगळे झाले आहेत. ठाकरे बंधु एकत्र येणारच असतील तर ते काय हिंदुत्त्त्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येणार नसून ते दोघेही स्वताच्या स्वार्थासाठी एकत्र येत असल्यचा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाकरे बंधुवर निशाना साधला. सध्या राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. यामध्ये राज्यात मुंबई महापालिका निवडनूकीत मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याच पार्शभुमिवर निशाना साधताना नितेश राणे यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्वासाठी किंवा महाराष्ट्रासाठी वेगळे झाले नव्हते तर त्यांच्या घरातील दोन बायकांच्या भाडणामधून ते वेगळे झाले होते. हे दोघे एकत्र येणार असतील तर त्यांच्या बायकांना विचारावे लागेल असे राणे यांनी म्हटले आहे. जर ते खरच एकत्र येणार असतील तर ते केवळ भाजपच्या हिंदुत्त्वाला घाबरून एकत्र येणार आहेत. ठाकरे बंधु हे हिंदुत्त्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यत नसल्याची टिका त्यांनी केली आहे.