मुंबई – महानगरपालिका निवडणुकांची लगबग सुरु होणार आहे. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे महापालिकेंना दिले आहेत. या निवडणूकांमध्ये मुंबई येथे एक सदस्यीय प्रभाग रचना असणार आहेत तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये आता चार सदस्यीय प्रभागांना प्राधान्य असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होत. त्यानंतर नगर विकास विभागाने राज्यामधील महापालिकेंच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले.
राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या आहेत. प्रभाग रचना आदेशामुळे या निवडणूका लवकरच होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिल्याने स्थानिक नेत आणि कार्यकर्त्यांची आशा पल्लवीत झाल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. ही रचना झाल्यानंतर लवकरचं निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासक नेमलेले आहेत. मात्र आता आगामी काळात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रभाग रचना करण्याचा आदेश सरकारने दिले असल्याचे नगरविकास विभागाने पुढील प्रक्रियेला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे. तर मुंबई महापालिकेची निवडणूक जुन्याच प्रभागानुसार होणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मात्र इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.