Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 19, 2024
in राजकीय
0
शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभा

मुंबई : शरद पवार किंवा उध्दव ठाकरे यांना निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत केले. ते वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, या दोन्ही नेत्यांच्या चौकशा चालू आहेत आणि त्यामुळे यांना पर्याय नाही. उद्या NRC, CAA, हिजाब किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल त्यावर राष्ट्रवादीचा निवडून दिलेला खासदार त्या सभागृहात बोलणार का ? तर अजिबात नाही.

काल मुंबईमध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा होत्या त्यावर देखील आंबेडकरांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, एकदंरीत आपण पाहिले की, काल मुंबईत दोन तमाशे झाले एक शिवाजी पार्क येथे झाला आणि दुसरा बीकेसी मैदानावर झाला. एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नव्हते. पुढील पाच वर्षांत काय करणार? याबाबतचा त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नव्हता.

पंतप्रधनाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असले पाहिजे, ते मानवतेचे कार्यालय न राहता आता ते वसुलीचे कार्यालय झाले आहे आणि या वसुलीमुळे २०१४ पासून १७ लाख कुटुंब की, ज्यांची मालमत्ता ५० कोटींच्या वरती आहे त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले आणि परदेशात स्थायिक झालेत. ही सरकारी आकडेवारी आहे.

तुम्हाला मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की, वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला ठरवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.


       
Tags: LoksabhamumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू

Next Post

भारतीय रेल्वेचे 70 टक्के खासगीकरण

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

भारतीय रेल्वेचे 70 टक्के खासगीकरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
बातमी

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

by mosami kewat
August 17, 2026
0

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी (१६ ऑगस्ट) मुस्लिम समाजातील तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे...

Read moreDetails
कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

August 17, 2026
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

August 16, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home