Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎२ वर्षांपासून सारथीची फेलोशिप ठप्प, तर महाज्योतीचे विद्यावेतनही केले बंद‎‎

mosami kewat by mosami kewat
September 9, 2025
in बातमी
0
‎२ वर्षांपासून सारथीची फेलोशिप ठप्प, तर महाज्योतीचे विद्यावेतनही केले बंद‎‎
       

आर्थिक अडचणीमुळे शहरातील त्रस्त विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात‎

‎औरंगाबाद : मराठा आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्य सरकारने सारथीअंतर्गत राबवलेल्या योजनांचे बॅनर शहरात लावले. दुसरीकडे मात्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या गटातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी देण्यात येणारी संशोधक विद्यार्थ्यांसाठीची सारथीची फेलोशिप दोन वर्षांपासून मिळालेली नाही. तसेच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महोत्योतीअंतर्गत समान विद्यार्थी समान धोरणाच्या नावाखाली ऑनलाइन प्रशिक्षण देण्याच्या कारणावरून विद्यावेतन बंद केले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी त्रस्त असल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.‎‎

२०१९ ते २०२३ पर्यंत ३,०७८ विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ५० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी फेलोशिप दिल्याचे म्हटले आहे. पुरेसे मनुष्यबळ आणि निधीचा अभाव असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. ते उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. २०२३ पासून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या फेलोशिपच्या प्रतीक्षेत असून यासाठी पुण्यात आंदोलन सुरू आहे.‎‎

ही विद्यार्थ्यांची अडवणूक‎‎

एका बाजूला शासन घोषणा करत आश्वासन देते. पण प्रत्यक्षात निधी कमी करत आहे. महाज्योती, सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप न मिळणे अडचणीचे आहे. आधीच मार्गदर्शकांची संख्या कमी झाली आहे. संशोधनासाठी विद्यार्थी कमी येत आहे. हे म्हणजे विद्यार्थ्यांना संशोधनापासून, विकासापासून रोखण्याचा हा प्रकार आहे.

‎‎- प्रा. मारुती तेगमपुरे, सचिव, बामुक्टो.


       
Tags: aurangabadFinancial difficultiesfundsMaharashtraMaratha kunbiSarthi Fellowshipstudent
Previous Post

चाकूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीची हत्या; नेपाळमध्ये हिंसाचार आणि आंदोलनाने घेतले हिंसक वळण

Next Post
माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीची हत्या; नेपाळमध्ये हिंसाचार आणि आंदोलनाने घेतले हिंसक वळण

माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीची हत्या; नेपाळमध्ये हिंसाचार आणि आंदोलनाने घेतले हिंसक वळण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home