मुंबई – भारतीय ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने व्याजदरात मोठी कपात केली आहे. सलग तिसरी व्याजकपात करताना ती अर्धा टक्क्यांनी ही दर कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईमुळे बेजार झालेल्या कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. याचा थेट फायदा गृहकर्जदारांना आणि वाहन कर्जदारांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी दि 6 जून रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची म्हणजे अर्ध्या टक्यांची व्याजदर कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. त्यामुळे रेपो रेटे थेट 6 टक्क्यांवरून आता 5.50 टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात केल्यास बँकांकडून साधारणपणे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाते. त्यामुळे देशातील आता गृहकर्जदार आणि वाहन कर्जदारांना या अर्धा टक्के व्याज कपातीचा मोठा दिलासा मिळाला आहे.