Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 6, 2025
in बातमी
0
मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

पुणे – मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र युद्धानंतर भारताच्या बाजून एकही देश का उभा राहिला नाही याबाबत लोकांनी मोदी,भाजप आणि संघाला प्रश्न विचारायला पाहिजेत असे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करत भारत पाक युद्वाबाबत अनेक प्रश्न पुणे येथे पत्रकारपरिषदेत उपस्थित केले. मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही याचे कारणे सरकारने मांडली पाहिजेत. भारताच आंतराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावे म्हणून अनेक देशांनी भारताला कोणीही उघड पाठिंबा दिला नाही. खर संकट हे युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थीती आहे. त्यावर प्रश्न विचारले पाहिजेत .

परवा आर्मी प्रमुख अनिल चव्हाण पुण्यात येवून गेले. त्यांनी भारताची विमाने पाकिस्तानने पाडली असे कबुल केले. तसेच पाकिस्तानने भारताचे नुकसान देखील केल्याचेही कबुल केले. मात्र दुसरिकडे मोदी देशाला खोटी माहिती देत आहेत असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मोदींनी कबुल केले आम्ही पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. मात्र पाकिस्तानला भारताची गोपनीय माहिती पुरवणाऱ्यांची माहीती मोदी देशाला देणार काय असे त्यांनी विचारले. हा गंभिर प्रश्न असून इथल्या राजकिय पक्षांनी व जनतेने पंतप्रधान आणि आरएसएस ला प्रश्न विचारले पाहिजेत. संघ व भाजपची जवळची माणसं भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत आहेत. त्याबाबत मोदी व भाजप संघाला लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

रशियाचे युद्ध सामुग्री, साहित्य आपल्याकडे आहे. मात्र रशियाने युद्धानंतर पाकिस्तानला मदत केली आहे. तर दुसरिकडे फ्रान्स ही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. भारत पाक युद्धात भारतीय सैनिकांनी जिंकलेली बाजू मोदींच्या धोरणांमुळे आपण हारलो. पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळी आपण हारतोय का याचा खूलासा मोदींनी करावा. मोदींसाठी भारतीय जनतेचा दबाव म्हत्वाचा की, अमेरिकेच्या ट्रम्पचा दबाव म्हत्वाचा होता ते सांगाव. अमेरिकेच्या दबावाखाली भारताने माघार घेतली आहे.

गल्लीतल्या मारामारीत देखील जो अग्रेसीव आहे तो जिंकतो. भारताने माघार घेतली म्हणून तुम्ही गांडूगिरी केली. भारताने माघार घेतल्यानंतर दोन दिवसांनी तिन्ही सैन्य दलांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे, पाकिस्तानात दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एकूण 91 ट्रेनिंग सेंटर आहेत. मात्र त्यातील भारताने केवळ 9 ट्रेनिंग सेंटर उडवली आहेत. त्यामुळे पाकिस्तानची सगळी दहशतवादी ट्रेनिंग सेंटर संपवल्याशिवाय दहशतवाद पुर्ण संपनार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारत जिंकण्याच्या परिस्थितीत होता. एअरफोर्स, आर्मीला तुम्ही बॉर्डरवर घेवून गेलात. यावेळी भारताला 1990 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी आतंकवादाला संपवण्याची संधी होती. मात्र ती आपण का गमावली असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तान पुन्हा दहशतवाद करणार नाही असे वदवून का घेतले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. लोकांनी भाजपला, मोदींना व संघाला प्रश्न विचारले पाहिजेत. पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी का गमावली, माघार का घेतली याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे.


       
Tags: Adv. Prakash Ambedkarbutcountriescountryindiamanymodinotsinglestoodvisited
Previous Post

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

Next Post

रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

Next Post
रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग
बातमी

Mumbai News : एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग

मुंबई : एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत घडणाऱ्या तांत्रिक बिघाडांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. नुकतीच अहमदाबादच्या विमानात घडलेली घटना ताजी ...

June 16, 2025
Mumbai News : नागरिकांचा संताप! गिरगावमध्ये रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात
बातमी

Mumbai News : नागरिकांचा संताप! गिरगावमध्ये रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात अडकली

मुंबई : मुंबईच्या गिरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सिग्नलजवळ मेट्रोचे काम सुरू होते. त्याच ठिकाणी अगदी जवळून जात असताना ...

June 16, 2025
Indrayani Kundmala Bridge Collapse: बाप लेकाचा मृत्यू; फादर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते पुण्यातील कुंडमळावर
बातमी

Indrayani Kundmala Bridge Collapse: बाप लेकाचा मृत्यू; फादर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते पुण्यातील कुंडमळावर

पुणे : पुण्यातील नदीवरील पूल कोसळल्यामुळे मोठी घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंडमळा ...

June 16, 2025
अग्निवीर मुरली नाईक यांना शहीदाचा दर्जा द्या, कुटुंबाला एक कोटींची मदत करा: प्रकाश आंबेडकरांची मागणी
बातमी

अग्निवीर मुरली नाईक यांना शहीदाचा दर्जा द्या, कुटुंबाला एक कोटींची मदत करा: प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई: घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर मुरली नाईक यांना सेवेत असताना वीरमरण आले, मात्र त्यांच्या कुटुंबाला केंद्र किंवा राज्य सरकारकडून ...

June 16, 2025
ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागुणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
बातमी

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; वैष्णवी हागुणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त १० मे २०२५ रोजी एक भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित ...

June 16, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क