Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

mosami kewat by mosami kewat
March 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 
       

खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात विविध साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील सध्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नुकतेच मंजूर करण्यात आलेले धार्मिक स्वातंत्र्य विधेयक हे जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच देशातील विविध प्रवाहांमध्ये मुस्लीम समाजाविषयी द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप करत त्यांनी ‘इस्लामोफोबिया’ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद केले. The Kerala Story सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून ‘हिंदू खतरे में है’ असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

देशातील धर्मांतराच्या आकडेवारीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, दलित, बहुजन तसेच भटके-विमुक्त समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारत आहेत.

धार्मिक स्वातंत्र्य विधेयकातील तरतुदींवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, धर्मांतर करण्यासाठी एक महिना आधी नोटीस देणे आणि जिल्हा न्यायाधीशांची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. तसेच विवाहानंतर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व घडामोडी लोकशाहीसाठी धोकादायक असून, “ही परिस्थिती दहशतवादाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली.


       
Tags: Anjali AmbedkarBollywoodConstitutionKhedMaharashtraMoviePoliticalratnagirireligionThe kerala story
Previous Post

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 
बातमी

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

by mosami kewat
March 30, 2026
0

खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे...

Read moreDetails
शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

March 30, 2026
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

March 30, 2026
पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

March 30, 2026
अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

March 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home