Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला पत्र !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 28, 2023
in राजकीय
0
प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीला पत्र !
       

नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही रोखण्यासाठी एकत्र या !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या ३ घटक पक्षांमधील जागावाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींचा कितीही गोंगाट सुरू असला, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी ४८ जागांचे महत्त्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य व “संघर्षमुक्त”  १२+१२+१२+१२ असे सूत्र २६ डिसेंबर २०२३ रोजी सुचवले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

१२+१२+१२+१२ हे सूत्र आम्ही केवळ मविआ व इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही, तर मविआ अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्याही दृष्टीने प्रस्तावित केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“१२ + १२ + १२ + १२” फॉर्म्युला हा केवळ नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडीआणि इंडिया आघाडी मध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही, तर जागावाटपबद्दल मविआमधील सर्व मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करण्यात आला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रात केला आहे.

महाविकास आघाडी मधील पक्ष – शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येने जागांवर लढवाव्यात ही वंचित ची इच्छा आहे.

 उद्धव ठाकरे, शरद पवार आणि श् मल्लिकार्जुन खर्गे – आमच्या प्रस्तावित फॉर्म्युलावर गांभीर्याने विचार करा आणि प्रतिसाद द्या. अशी विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

 कारण, संपूर्ण महाराष्ट्र आमच्या १२ + १२ + १२ + १२ च्या प्रस्तावित फॉर्म्युल्याबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. मला मनापासून आशा आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचारविनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिले जाईल. असा आशावादही त्यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे.


       
Tags: CongressMaharashtraNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शरद पवारांच्या पुढाकाराचे ‘वंचित’ कडून कौतुक !

Next Post

भाजपच्या माजी खासदारावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ‘वंचित’ ची मागणी !

Next Post
भाजपच्या माजी खासदारावर  अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ‘वंचित’ ची मागणी !

भाजपच्या माजी खासदारावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची 'वंचित' ची मागणी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सेवलीला अप्पर तहसील कार्यालय न मिळाल्याने ‘वंचित’ आक्रमक; सेवलीत एकदिवसीय धरणे आंदोलन
बातमी

सेवलीला अप्पर तहसील कार्यालय न मिळाल्याने ‘वंचित’ आक्रमक; सेवलीत एकदिवसीय धरणे आंदोलन

by mosami kewat
June 18, 2026
0

जालना : राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या अप्पर तहसील कार्यालयांच्या यादीत सेवली गावाचा समावेश न केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या...

Read moreDetails
औरंगाबादमध्ये स्मार्ट मीटर सक्तीचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू – रुपचंद गाडेकर

औरंगाबादमध्ये स्मार्ट मीटर सक्तीचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू – रुपचंद गाडेकर

June 18, 2026
पुण्यात उद्या विद्यार्थी आक्रोश मोर्चा: NTA रद्द करा ; शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा

पुण्यात उद्या विद्यार्थी आक्रोश मोर्चा: NTA रद्द करा ; शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा

June 18, 2026
शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी - ॲड. प्रकाश आंबेडकर

शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी – ॲड. प्रकाश आंबेडकर

June 18, 2026
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

June 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home