Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

mosami kewat by mosami kewat
March 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
       

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेले भाषण केले.

आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे थेट उत्तरांची मागणी केली. या पाच राफेल विमानांपैकी किती भारताच्या सीमेत कोसळले आणि किती पाकिस्तानात कोसळले, असा सवाल त्यांनी केला. तसेच, जर एखादे विमान पाकिस्तानात कोसळले असेल, तर त्या विमानाचा पायलट कुठे आहे? त्याला परत भारतात आणले आहे का, नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Prakash Ambedkar Leads Nagpur Protest)

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि याबाबत उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी सनातनवाद्यांनाही आवाहन केले की, त्यांनीही हे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावेत.

विरोधी पक्षांना उद्देशून त्यांनी सांगितले की, आरएसएस आणि सरकारपासून घाबरण्याची गरज नाही. “जेलमध्ये टाकण्याची किंवा दबाव टाकण्याची भीती बाळगून प्रश्न विचारणे थांबवू नका,” असे ते म्हणाले. (Prakash Ambedkar Leads Nagpur Protest)

आपल्या भाषणात आंबेडकर यांनी वैयक्तिक अनुभव सांगताना असेही नमूद केले की, त्यांना धमक्या देण्यात आल्या; मात्र ते ना घाबरणार, ना झुकणार, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी स्वतःला “फकीर” संबोधत सांगितले की, त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही आणि त्यांनी आयुष्यात कधी भ्रष्टाचार केला नाही किंवा लाच घेतली नाही; तरीही ते सत्तेला उघड आव्हान देत आहेत.

परराष्ट्र धोरणावर बोलताना त्यांनी आरोप केला की, भारताचे धोरण अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करत आहे. त्यांनी नमूद केले की, इराण सारख्या देशांनी नेहमी भारताची साथ दिली आहे. आर्थिक निर्बंध असतानाही भारताला रुपयांमध्ये तेल देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. अशा मित्र देशांशी भारताने निष्ठा राखली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. (Prakash Ambedkar Leads Nagpur Protest)

इस्रायल संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले की, भारताला त्यांच्या मदतीची गरज नाही, कारण भारतीय सेना आणि वायुदल स्वतः सक्षम आहे. तसेच, अनेक प्रसंगी रशिया ने भारताला मदत केली असून महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे, असा दावाही त्यांनी केला.

आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध कोणत्याही धर्म किंवा ब्राह्मण समाजाविरुद्ध नसून केवळ आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध आहे. या आंदोलनाचा चुकीचा अर्थ लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला. (Prakash Ambedkar Leads Nagpur Protest)

तसेच, त्यांनी काँग्रेस, सीपीएम आणि इतर राजकीय पक्षांना आवाहन केले की, या आंदोलनाचे केंद्र दिल्ली बनवावे आणि लाखोंच्या संख्येने लोकांना एकत्र आणून केंद्र सरकारकडून उत्तरांची मागणी करावी. असे झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला.

शेवटी, त्यांनी देशाची स्वातंत्र्य, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जनतेने घाबरू नये आणि पुढील १०-१५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या मुद्द्यांवर उत्तरांची मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले. (Prakash Ambedkar Leads Nagpur Protest)

भाषणाचा शेवट त्यांनी “जय हिंद, जय भारत” या घोषणांनी केला.


       
Tags: Epstein fileJusticeMaharashtranagpurNagpur protestnarendra modiPolitical prakash AmbedkarPrakash Ambedkar Leads Nagpur ProtestrssVanchit Bahujan Aghadiनागपूर
Previous Post

भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

Next Post

बार असोसिएशन निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी बजावला मताचा हक्क

Next Post
बार असोसिएशन निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी बजावला मताचा हक्क

बार असोसिएशन निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी बजावला मताचा हक्क

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home