दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी १७ वर्षांनंतर पूर्ण झाली असून, विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणातील भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश असलेल्या सर्व आरोपींची पुरेशा पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
न्यायालयाने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये एका मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या स्फोटक उपकरणात स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!
पुणे: बांधकाम कामगार आणि श्रमिकांना संघटित करणारी महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या बांधकाम कामगार श्रमिक सेना (महाराष्ट्र राज्य) या संघटनेने वंचित बहुजन...
Read moreDetails






