Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Adivasi protest 2025 : मुंबईत भटक्या विमुक्त आदिवासी समाजाचे न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन!

mosami kewat by mosami kewat
July 1, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Adivasi protest 2025 : मुंबईत भटक्या विमुक्त आदिवासी समाजाचे न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन!

Adivasi protest 2025 : मुंबईत भटक्या विमुक्त आदिवासी समाजाचे न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन!

       

मुंबई : भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुंबईतील आझाद मैदान येथे भटक्या विमुक्त समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी १ ते ४ जुलै २०२५ दरम्यान राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरू असून, समाजाचे हक्क आणि सन्मान प्राप्त करणे हा यामागचा उद्देश आहे.

गेल्या वर्षी भटक्या विमुक्त संयोजन समितीच्यावतीने राज्यभर ‘संवाद यात्रा’ काढण्यात आली होती. त्यामध्ये १८ जिल्ह्यांतील हजारो समाज बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मागण्यांचे दस्तावेजीकरण करण्यात आले होते. मात्र, अजूनही कोणत्याही मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे राज्यभरातील संयोजन समितीच्या जिल्हा सदस्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी शासनाला निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. आंदोलनात संबंधित जिल्ह्यातील सदस्य सहभागी झाले आहेत.

आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या –

१.  भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय व मंत्री: भटक्या विमुक्त समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून, त्यावर याच समाजातील मंत्र्याची नियुक्ती करावी.

२.  नागरिकत्वाचे पुरावे: स्थानिक पुरावे व गृह चौकशीच्या आधारे नागरिकत्वासाठी आवश्यक दस्तऐवज (जातीचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार, जन्म प्रमाणपत्र इत्यादी) देण्यात यावेत.

३.  जमिनींचे नियमन व नियमितीकरण : गायरान, गावठाण, वनजमीन व वहिवाटीतील अतिक्रमीत जमिनी भटक्या विमुक्त व आदिवासी समुदायासाठी नियमित करण्यात याव्यात.

४.  अॅट्रॉसिटीसारखे संरक्षण कवच : भटक्या विमुक्त समुदायांवरील अन्याय-अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांना समाजात सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राज्याने अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणेच विशेष संरक्षण कायदा लागू करावा.

५.  ‘विमुक्त दिन’ घोषणा : ३१ ऑगस्ट हा दिवस ‘विमुक्त दिन’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात यावा, जेणेकरून या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व आणि समाजाचे योगदान अधोरेखित होईल.

संयोजन समितीचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच शासनाने आंदोलनादरम्यान संवाद साधून मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. असे न केल्यास ४ जुलै रोजी समाजाचे शेकडो प्रतिनिधी विधानभवनासमोर उपस्थित राहतील.

असा राज्य सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या पावसाळी अधिवेशनात मागण्यांवर गांभीर्याने विचार झाला नाही, तर संपूर्ण भटके विमुक्त समाज शासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ही देण्यात आला आहे.


       
Tags: Adivasi protest 2025azad maidanMaharashtramumbaiprotestrights
Previous Post

VBA Aurangabad : वंचित बहुजन आघाडीच्या दणक्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेंगोल’ हटवला

Next Post

Operation Sindoor वरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप हवाई दलाने गमावली विमाने?

Next Post
Operation Sindoor वरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप हवाई दलाने गमावली विमाने?

Operation Sindoor वरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप हवाई दलाने गमावली विमाने?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव
बातमी

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

by mosami kewat
August 11, 2025
0

‎अकोला - वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक...

Read moreDetails
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

August 11, 2025
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

August 11, 2025
'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

August 11, 2025
‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

August 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home