Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 7, 2024
in राजकीय
0
सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर
       

कापूस उद्योग वाढवायचा असेल तर शेतकरी जगला पाहिजे

नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे एकूण व्यवहार साधारणतः ६ लाख कोटींच्या आसपास आहेत. भारताने यापैकी एक लाख कोटीचा व्यवहार देशात आणला, तरी देशातील रोजगाराचे प्रमाण दुप्पट होईल. यासाठी हा उद्योग वाढवायचा असेल, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सांभाळणे महत्त्वाचे आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केले.

कापसाचे क्षेत्र दरवर्षी कमी कमी होत आहे. शेतकरी सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळत आहे. शेतकरी हा कापसावर आधारित असला पाहिजे, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून त्याला पाठिंबा मिळत नाही. तो पाठिंबा त्याला मिळायला पाहिजे. महाराष्ट्रात १२ कोटी क्विंटल कापूस उत्पादन होते. शेतकऱ्यांना पणन महासंघाकडून ५०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे शासन अनुदान दिले जात होते. ते बंद आहे, ती पद्धत शासनाने पुन्हा सुरू करावी. शासनाने हे केले नाही, तर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर ती पद्धत सुरू करेल, असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, सध्या कापूस वेचायला माणसं मिळत नाहीत. मिळाली, तर त्याचा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. यावर उपाय काढता येवू शकतो, ती इच्छाशक्ती सरकारने दाखवली पाहिजे. महाराष्ट्रात EGS निधी गोळा केला जातो. तो निधी वर्षाला 32 हजार कोटींच्या आसपास जमा होतो. या निधीच्या माध्यमातून कापूस वेचणाऱ्या माणसाला प्रति क्विंटल 5 रुपये शासनाने द्यायला हवेत. सरकारने या गोष्टी करण्याची गरज आहे, पण त्यांनी हे केले नाही तर कापसाच्या किंमती संदर्भातील प्रश्न आम्ही सत्तेत आल्यावर प्राधान्याने सोडविणार आहोत. किंमती व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काय द्यायचे आहे, त्याबाबतची मांडणी देखील आम्ही केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

VVPAT स्लीप मोजण्याचा आग्रह धरावा


मागील पाच वर्षांपासून EVM विरोधात मी एकटाच लढत आहे. EVM वरील मतदान ज्याप्रमाणे मोजले जाते. त्याप्रमाणे VVPAT सुद्धा मोजले गेले पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षांनी न्यायालय आणि निवडणूक आयोगावर दबाव टाकला पाहिजे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.


       
Tags: cottonFarmernagpurPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ख्रिस्ती समाजालाही निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळावे !

Next Post

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

Next Post
‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

'प्रबुद्ध भारत' वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप
बातमी

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

by mosami kewat
April 3, 2026
0

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली...

Read moreDetails
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

April 3, 2026
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home