Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष चळवळीचा दस्तऐवज

शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल;चौकशी समिती गठीत होणार

Tanvi Gurav by Tanvi Gurav
August 2, 2025
in चळवळीचा दस्तऐवज, बातमी, मुख्य पान, विशेष, सामाजिक
0
शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल

शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल

       

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : परभणीतील शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत दाखल झालेल्या एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत केली जाणार असून त्यानंतर औपचारिक चौकशीस सुरूवात होणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस कोठडीत अमानुष मारहाण झाल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला. प्रारंभी पोलिसांनी मृत्यूचे कारण ‘हृदयविकाराचा झटका’ असल्याचे सांगितले होते.

मात्र, वैद्यकीय अहवालामुळे हा दावा फोल ठरला. विजयाबाई यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात त्या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत स्पष्ट निर्देश दिले की आरोपींचं नाव माहीत नसले तरी एफआयआर दाखल होऊ शकतो. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. या संदर्भात चौकशी समिती गठीत केली की चौकशीला सुरुवात होईल. हा निर्णय केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी संविधानिक न्यायाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल
चळवळीचा दस्तऐवज

शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल;चौकशी समिती गठीत होणार

by Tanvi Gurav
August 2, 2025
0

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती मुंबई : परभणीतील शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने...

Read moreDetails

पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम

August 2, 2025
जेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया जन्माला आला नव्हता; तेव्हा भारिप बहुजन महासंघाचे चंद्रपूरचे एक प्रमुख कार्यकर्ते प्रा. एस.टी. सरांसारखे सहकारी स्थानिक दैनिकं, अनियकालिकात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत होते.

दस्तऐवज चळवळीचा….३२ वर्षांपूर्वीचा….

August 2, 2025
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विशिष्ट ध्येय्याने झपाटलेले दोन-चार तरुण जरी एकत्र आले, तरीही चळवळ जन्माला येते. एकेक करत कार्यकर्ते जोडत जाते आणि फोफावतेही. ते तरुण समाजाची आशा बनतात.

माणूस हाच केंद्र बिंदू!..प्रा. एस. के. जोगदंड वैचारिक बांधिलकी, पक्ष शिस्त, नेत्याला कायम साथ…एक आदर्श!

August 2, 2025
भाजप : जन सुरक्षा विधेयक, १९२५, कॉंग्रेस : महाराष्ट्र सुरक्षा दल विधेयक, १९८६, झाले की नाही दोघांचे ऐक्य? का?

भाजप : जन सुरक्षा विधेयक, १९२५, कॉंग्रेस : महाराष्ट्र सुरक्षा दल विधेयक, १९८६, झाले की नाही दोघांचे ऐक्य? का?

August 2, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home