Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे; ॲड. प्रकाश आंबेडकर याचे सवाल

mosami kewat by mosami kewat
December 23, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे; ॲड. प्रकाश आंबेडकर याचे सवाल

घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे; ॲड. प्रकाश आंबेडकर याचे सवाल

       

अकोला : नागरिकांनी आता ठरवायचे आहे की त्यांना घाणीत, अविकसित शहरात राहायचे आहे की विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे आहे. जर घाणीत राहायचे असेल तर कमळाला मतदान करा, नाहीतर वंचितला साथ देऊ आमच्या हाती सत्ता द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मंगळवारी सकाळी अकोला येथे यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, शहरात महिलांसाठी मूलभूत सुविधा नाहीत, करांचा (टॅक्स) बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भाजप सत्तेने नागरिकांवर अन्यायकारक कर लादले असून, ही लूट थांबवली पाहिजे. यासंदर्भात दिवंगत नगरसेविका धनश्री देव यांनी याचिका दाखल केली होती असेही त्यांनी सांगितले. महापौर वंचित बहुजन आघाडीचा असताना शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. आज शहराची लोकसंख्या वाढत असताना पाणी आरक्षणाबाबत कोणताही ठोस विचार झालेला नाही. दगडपरवा धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाही की सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी? पुण्यात आचारसंहितेचा खेळ सुरू

शहरातील डम्पिंगचा प्रश्न गंभीर असून, किमान चार डम्पिंग ग्राउंड उभारले पाहिजेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे एका अर्थाने ‘सोने’ असून, त्यातून रोजगार व उत्पन्ननिर्मिती शक्य आहे; मात्र भाजप सत्तेने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या काळात करांची लूट आणि असुविधा

शॉप अॅक्टच्या भाडेवाढीबाबत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित सत्तेत असताना कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नव्हती. भाजपनेच ही भाडेवाढ करून व्यापारी व नागरिकांवर बोजा टाकला आहे. तसेच रेल्वे उड्डाणपुलाचे काम वर्षानुवर्षे रेंगाळत असून, ते पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात काहीच झालेले नाही.

वाढते तापमान आणि पर्यावरणाचे आव्हान

अकोल्याचे वाढते तापमान चिंतेचा विषय असून, बाळापूर परिसरात तापमान तुलनेने कमी असते. अकोल्याचे तापमान कमी करण्यासाठी मोरणा नदीवर बंधारा उभारण्यासह विविध उपाययोजना राबविण्याचा वंचित बहुजन आघाडीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. खुले नाट्यगृह नव्याने उभारण्याचाही विचार असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराप्रमाणे पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन अकोल्यातही राबवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उबाठा, शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची युती बाबत बोलणे झाले आहे. स्थानिक वंचितचे नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील असेही ते म्हणाले. 29 तारखेला अंतिम निर्णय होईल. असेही आंबेडकर म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड, सचिव मिलिंद इंगळे, संतोष रहाटे, गजानन गवई, पराग गवई, वंदना वासनिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AkolaCityAkolaMunicipalElectionAkolaNewsBJPvsVBACivicIssuesEnvironmentalConcernsInfrastructureDevelopmentLocalBodyElectionsmaharashtrapoliticsPoliticalStatementprakashambedkarPressConferencePublicIssuesSolidWasteManagementTaxBurdenUrbanDevelopmentvanchitbahujanaghadiWaterCrisis
Previous Post

अकोला पॅटर्न पोहोचला संपूर्ण महाराष्ट्रात – भास्कर भोजने

Next Post

यवतमाळच्या विजयी नगरसेवकांनी घेतली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

Next Post
यवतमाळच्या विजयी नगरसेवकांनी घेतली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

यवतमाळच्या विजयी नगरसेवकांनी घेतली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून सुजात आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार; कॉर्नर सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
बातमी

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून सुजात आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार; कॉर्नर सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

by mosami kewat
January 12, 2026
0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रभागात वंचित बहुजन आघाडीकडून सभा घेतली जात आहे. यामुळे संपूर्ण...

Read moreDetails
अकोला मनपा निवडणूक २०२६: प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ८ मध्ये वंचितची भव्य प्रचार रॅली

अकोला मनपा निवडणूक २०२६: प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ८ मध्ये वंचितची भव्य प्रचार रॅली

January 12, 2026
वॉर्ड १३९ मध्ये सुजात आंबेडकरांची पदयात्रा; वंचित-काँग्रेस युतीच्या उमेदवार स्नेहल सोहनींच्या प्रचाराचा धडाका

वॉर्ड १३९ मध्ये सुजात आंबेडकरांची पदयात्रा; वंचित-काँग्रेस युतीच्या उमेदवार स्नेहल सोहनींच्या प्रचाराचा धडाका

January 12, 2026
३५ पैशात भविष्य विकू नका! भ्रष्टाचाऱ्यांचा ‘सुफडा साफ’ करणार – सुजात आंबेडकर

३५ पैशात भविष्य विकू नका! भ्रष्टाचाऱ्यांचा ‘सुफडा साफ’ करणार – सुजात आंबेडकर

January 12, 2026
सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; ऐरोलीतील ‘कॉर्नर’ सभेत जनसागर लोटला

सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; ऐरोलीतील ‘कॉर्नर’ सभेत जनसागर लोटला

January 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home