Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शेतकऱ्यांनी निवडणुकीत सडेतोड उत्तर द्यावे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 15, 2024
in राजकीय
0
शेतकऱ्यांनी निवडणुकीत सडेतोड उत्तर द्यावे
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : महाविकास आघाडीला वंचितने दिलेल्या मसुद्यात एमएसपीचा मुद्दा !

मुंबई : शेतकऱ्यांची मागणी रास्त असून, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र, त्यांची वाट अडवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे, हे लोकशाहीला धरून नाही. सध्या देशभर लोकशाहीची हत्या होत असल्याचे चित्र असून, दिल्लीत जमलेल्या आणि देशभरातील शेतकऱ्यांनी येत्या निवडणुकीत भाजपला सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.

माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या हक्कांसाठी कोणाकडे याचना करताय? ते स्वत: लालाच्या मांडीवर बसून तुम्हाला लुटत आहेत. जर तुम्हाला तुमच्या हक्काची लढाई जिंकायची असेल, तर येत्या निवडणुकीत त्यांना सडेतोड उत्तर द्या, असे ॲड. आंबेडकरांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जोरदार आंदोलन केले होते. या वेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करत कृषी कायदे रद्द केले. मात्र, आता पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. एमएसपीबाबत कायदा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. तर, दुसरीकडे सरकार आंदोलन रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर शेतकरी आता पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकरांनी हे ट्विट केले आहे.

या पूर्वीही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचे ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, किमान आधारभूत किंमत (एमएसपी)  कायदेशीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी अतिशय वाजवी आणि न्याय्य आहे. शेतकऱ्यांना खासगी कंपन्या आणि खरेदीदारांच्या दयेवर सोडून चालणार नाही.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला सादर केलेल्या 39 कलमी अजेंड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत प्रमुख अजेंड्यांपैकी एक असल्याचा उल्लेख देखील त्यांनी यात केला होता.

शेतकऱ्यांना एमएसपी खात्रीशीर देण्याचे मार्ग देखील त्यांनी सांगितले होते.

1. सरकारने नेहमीपेक्षा जास्त खरेदी करावी.

2. एमएसपी आणि बाजारभाव यांच्यातील तफावत भरुन काढण्यासाठी शेतकऱ्याला तूट भरपाई दिली जाते.

3. शेतकऱ्यांची तूट भरून काढण्यासाठी सरकारने प्राइस डेफिसिट फंड तयार केला पाहिजे. जर महाराष्ट्रातील शेतकरी एमएसपीच्या मागणीसाठी असाच आंदोलन करत राहिला, तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या मागणीला मनापासून पाठिंबा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.


       
Tags: FarmerMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सिंबॉयसिस कॉलेज, येथे ‘वंचित’ च्या युवा आघाडीच्या शाखेचे उद्घाटन !

Next Post

‘वंचित’च्या कार्यालयाची तोडफोड !

Next Post
‘वंचित’च्या कार्यालयाची तोडफोड !

'वंचित'च्या कार्यालयाची तोडफोड !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Beed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित परिवर्तन घडवणार – किरण वाघमारे
बातमी

Beed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित परिवर्तन घडवणार – किरण वाघमारे

by mosami kewat
November 11, 2025
0

वंचित बहुजन आघाडी गण प्रमुख व गट प्रमुखांची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न बीड : वंचित बहुजन आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य...

Read moreDetails
नांदेड मध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र : 50- 50 च्या आधारावर आघाडीची घोषणा

नांदेड मध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र : 50- 50 च्या आधारावर आघाडीची घोषणा

November 11, 2025
दिल्ली स्फोटप्रकरणी ॲड. प्रकाश आंबेडकरांची 'संघा'वर गंभीर शंका; 'इंटर्नल' स्फोटांची सखोल चौकशी करण्याची मागणी

दिल्ली स्फोटप्रकरणी ॲड. प्रकाश आंबेडकरांची ‘संघा’वर गंभीर शंका; ‘इंटर्नल’ स्फोटांची सखोल चौकशी करण्याची मागणी

November 11, 2025
'फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला'; ओबीसींनी 'त्या' तीन पक्षांना मतदान करू नका - ॲड प्रकाश आंबेडकर

‘फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला’; ओबीसींनी ‘त्या’ तीन पक्षांना मतदान करू नका – ॲड प्रकाश आंबेडकर

November 11, 2025
नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय

नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय

November 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home