Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

कुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 11, 2021
in राजकीय
0
0
SHARES
216
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे, पुन्हा कडक लॉकडॉऊन लावण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. पण लॉकडॉऊन पुन्हा लागला तर त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकार जनतेला हव्या त्या जीवनावश्यक सुविधा पुरविण्यास तयार आहे का? सरकार सुविधा पुरविण्यास समर्थ आहे की नाही? यावर आता जनतेने विचार करायची वेळ आलेली आहे.

मार्च 2020 मध्ये भारतात पूर्णपणे लॉकडॉऊन लावण्यात आला तेंव्हा हजारो किलोमीटर पायपीट करत आपल्या गावी जाणारे लाखो मजूर आपण पाहिलेत. पुरेश्या वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आजारी पडणाऱ्या जनतेचे हाल आपण बघितलेत. धंदा बंद, नौकरी बंद, दुकान बंद, पगार बंद यामुळे आर्थिक विवंचना तर सर्वांनीच भोगलीय. कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांचे झालेले हाल जगजाहीर आहेत. लॉकडॉऊन केल्यानंतर अश्या आपात्कालीन परिस्थितीसाठी त्यावेळी सरकार तयारच नव्हती कारण सरकारने आपात्कालीन व्यवस्थेचा कधी विचारच केला नव्हता. आजची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही.

आज घडीला महाराष्ट्रात 6 लाख पेक्षा जास्त कोविड पेशंट आहेत, रोज कमीतकमी 10 हजार पेक्षा जास्त लोकांना कोविडची लागण होत असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा लॉकडॉऊन लावायच्या चर्चा सरकार कडुन सुरू झाल्या आहेत. मागच्या वर्षी उद्भवलेल्या परीस्थितीत लॉकडॉऊन नंतर जनतेला जो त्रास झाला तो त्रास पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने आपल्या आपात्कालीन व्यवस्थेत काही सुधार केल्याचे दिसत नाही. आजही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत, औषध उपलब्ध नाहीत, लसीकरणासाठी लस उपलब्ध नाहीत. पुन्हा लॉकडॉऊन झाल्यास मजूर, कामगार वर्गाचे हाल होऊ नयेत याची काही व्यवस्था नाही. मागच्या वर्षी सामाजिक संघटनांनी, वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने आणि अनेक लोकांनी वैयक्तिक पातळीवर गरजूंना मदत केली पण आता मदत करणारेही आर्थिक पातळीवर हतबल झालेले आहेत. अश्यात पुन्हा लॉकडॉऊन लागल्यास जनतेने कसे जगावे याचे उत्तर सरकारकडे नाही.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनि एकमेकांवर कुरघोड्या करण्यात वेळ वाया घालवून महाराष्ट्राला पुन्हा मोठ्या संकटात ढकलले आहे. एक वर्षात सरकारने आपात्कालीन व्यवस्थापनाच्या दिशेने काय केले याचा जाब विचारणे आता क्रमप्राप्त झाले आहे.


       
Tags: Congresscoronacovid19lockdownMaharashtramaharashtrgovernmentmahavikasaghadimigrationmodimumbaiNCPShivsenaVanchit Bahujan Aaghadivbaअर्थव्यवस्थाकोरोनाकोविड-१९
Previous Post

२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत

Next Post

निऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का ?

Next Post
निऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का ?

निऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का ?

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण
बातमी

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण

बार्शिटाकळी - मंगरूळपिर राज्य महामार्गावरील विद्रुपा नदीवर कान्हेरी सरप जवळील आणि शिवम जिनींग फॅक्ट्री जवळील पुलावर मागच्या वर्षीपासून कठडे नाहीत, ...

March 16, 2023
भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.
बातमी

भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.

३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार अकोला : भाजपचे खासदार, आमदार आणि महापौर ...

March 16, 2023
चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक
सामाजिक

चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक

पुणे  जिल्ह्यातील जुन्नर  शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्य शासनाने ...

March 13, 2023
जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल
बातमी

जैन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान; वंचित बहुजन युवा आघाडीची पोलिसात तक्रार दाखल

बंगलोर - जैन विद्यापीठ बँगलोर येथे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात दलित समाजा बद्दल आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉ. ...

February 10, 2023
वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत
बातमी

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

पुणे : वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ...

January 23, 2023
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क