Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीने निवड केलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिप अवॉर्डसाठी आता आरपार ची लढाई लढणार – राजेंद्र पातोडे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 2, 2023
in बातमी
0
बार्टीने निवड केलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिप अवॉर्डसाठी आता आरपार ची लढाई लढणार – राजेंद्र पातोडे.
       

मुंबई, दि.२ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BAN – २०२१ अंतर्गत बार्टी नियामक मंडळाच्या व महासंचालक ह्यांचे मान्यतेने दिनांक १ फेब्रुवारी २०२३ नुसार सचिव सामाजिक न्याय विभागास दिलेल्या निवडसूची नुसार ८६१ विद्यार्थी पात्र करण्यात आले आहेत. ह्या ८६१ पात्र विध्यार्थ्यांना फेलोशिप अवॉर्ड करण्यासाठी आता आरपारची लढाई लढून ही फेलोशिप अवॉर्ड ८६१ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी लवकरच युवा आघाडी राज्यपाल आणि बाळासाहेब आंबेडकर ह्यांना मुख्यमंत्री सोबत बोलून मार्गी लावू असा शब्द वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी संशोधक विद्यार्थी कृती समितीचे पदाधिकारी ह्यांना दिला ह्यावेळी भारिप बमसंचे प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.

एकूण सर्व ८६१ पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबत आदेश लवकरात लवकर निर्गमित करावे, ह्या बाबत स्नेहल भोसले, विभागप्रमुख योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे ह्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले आहे. त्यासाठी ३२ व्या बैठकीमध्ये विषय क्र. ७ च्य मान्यतेनुसार एकूण २०० विद्यार्थ्यांना सदर अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता मिळाली होती ती केवळ २०० विद्यार्थ्यांची सूची ग्राह्य न धरता ८६१ विद्यार्थी बार्टी द्वारे पात्र करण्यात आले आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाचा भ्रष्ट आणि जातीयवादी सचिव सुमित भांगे हा जाणीवपूर्वक ह्या पात्र ८६१ विद्यार्थी ह्यांना वेठीस धरत आहे. वंचित बहूजन युवा आघाडी लवकरच भांगे च्या भानगडी बाहेर काढून त्याचा समाचार घेईल.

निवडसूची नुसार पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप अवॉर्ड करण्याच्या दृष्टीने ह्या विषयावर युवा आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपाल ह्यांना भेटतील. तसेच एड बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बोलून हा विषय मार्गी लावण्यासाठी आरपार ची लढाई सुरू केली असून सरकार बधले नाही तर प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका करून सर्व निवड झालेल्या ८६१ पात्र विध्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे अभिवचन राजेंद्र पातोडे ह्यांनी दिले आहे.


       
Tags: #Barti#barti_fellowship#CMOMaharashtra#rajendrapatode#SujatAmbedkar#VBA #prakashambedkar#अत्यंत_महत्वाचे#शिंदेफडणवीस #राजेंद्रपतोडे#सामाजिकन्याय
Previous Post

सावरकर तो बहाना है, अदानी को बचाना है.

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटाच्या पुतळ्याचे हैदराबादमध्ये अनावरण होणार !

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटाच्या पुतळ्याचे हैदराबादमध्ये अनावरण होणार !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटाच्या पुतळ्याचे हैदराबादमध्ये अनावरण होणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य
क्रीडा

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

by mosami kewat
July 28, 2026
0

Commonwealth Games : सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अनेक प्रेरणादायी कामगिरी समोर येत आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं...

Read moreDetails
औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

औरंगाबादमध्ये दूषित पाणीपुरवठ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआक्रोश आंदोलन; समस्या न सुटल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

July 28, 2026
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

July 28, 2026
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home