Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेकरांची परिवर्तन सभा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 4, 2024
in राजकीय
0
अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेकरांची परिवर्तन सभा
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : गेल्या 10 वर्षात 84 हजार शेतकरी,शेतमजूर यांच्या आत्महत्या

अंबाजोगाई : गेल्या १० वर्षात देशातील ८४ हजार शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या याची बातमी कुठेही आली नाही. यापैकी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मोदीने किती मदत दिली याची माहिती द्यावी असेॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला. ते वंचित बहुजन आघाडी बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, उमेदवार अशोक हिंगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान यांचं कार्यालय हे मानवतेच कार्यलाय असताना हे वसुलीचे कार्यलाय झालं, राजकारणात नीतिमत्ता ची फार मोठी किंमत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणात कुठेही नीतिमत्ता दिसत नाही असं म्हणत महायुतीवर निशाण साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची बांधिलकी नाही, ज्याला नीतिमत्ता नाही तो त्याच्या फायद्यासाठी काम करणार असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला.

मोदी असं म्हणतात माझ्या कालावधीत काहीच करप्शन झालं नाही काँग्रेसवल्यानी लिस्ट काढली त्या लिस्ट मध्ये किती ठिकाणी कारप्शन झालं याची लिस्ट काँग्रेसवाल्यानी दिली ती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेसमोर वाचून दाखवली. महागाई बरोबर बेरोजगारी वाढली, मोदींमुळे सगळं देशोधडीला लागले, हे चोरांचे, व्यापाराचे, लुटारांचे सरकार आहे.इथले शासन राज्य करण्यासाठी नाही तर तोडमोड करण्यासाठी आहे .मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण साठी राजकीय भूमिका घेणं अवघड झालं. इथल्या गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे. शरद पवारांना देखील मी भूमिका घेण्यासाठी सांगितले होते. असे ॲड.आंबेडकर म्हणाले.

 अंबाजोगाई येथील सभेला उपस्थित मान्यवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर,बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शैलेश कांबळे, मिलिंद घाडगे, पंजाबराव डक, विष्णु जाधव, डॉ.धर्मराज चव्हाण, महेश निनाळे, तय्यब खान, बिभीषण चाटे, खाजामिया पठान, बाबुराव मस्के, विष्णु देवकाते, वैभव स्वामी, डॉ.नितिन सोनवणे, प्रा. छाया हिरवे, ॲड.अनिता चक्रे, पुष्पाताई तुरूकमारे, यूनुस शेख, पुरुषोत्तम वीर, सुरेश पोतदार, धम्मनंद साळवे, सचिन उजगरे, अंकुश जाधव, रानबा उजगरे, बालाजी जगतकर,अजय सरवदे, बालासाहेब जगतकर, गौतम आगळे, प्रसन्नजित रोडे, चंद्रकांत खरात, रोहन मगर, पुर्वचे जिल्हा तालुका आणि शहर, समता सैनिक भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अशोक हिंगे विकासाचे राजकारण करणार –

उमेदवार अशोक हिंगे पाटील जातीपातीचे नाहीतर विकासाचे राजकारण करणार, महाविकास आघाडी व महायुती हे दोघे एकच आहेत, त्यांना धडा शिकवण्यासाठी मला ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी बीड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मराठा आरक्षण तसेच मुस्लिम, धनगर,आरक्षण प्रश्नावर आपण अगोदरही भूमिका घेतली आहे.आत्ता ही घेली आहे. आणि यापुढेही भूमिका घेऊन मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे मला लोकसभेत पाठवा, प्रस्थापित राजकीय धडा शिकवा असे हिंगे यांनी सांगितले.


       
Tags: Ashok HingebeedLoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दारूड्याची वृत्ती देशासाठी घातक

Next Post

..अन् मीरातीईंनी प्रकाश आंबेडकरांना समाजासाठी ‘दान’ केले

Next Post
..अन् मीरातीईंनी प्रकाश आंबेडकरांना समाजासाठी ‘दान’ केले

..अन् मीरातीईंनी प्रकाश आंबेडकरांना समाजासाठी 'दान' केले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
बातमी

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

by mosami kewat
August 24, 2026
0

नांदेड : जयभीम नगर येथे मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या समस्येची...

Read moreDetails
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home