औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. त्यांनी भाजपवर धांदल करून विजय मिळवला गेला असल्याचा आरोप केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
आज संजयनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपविरोधात जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी प्रभाग क्र. २४ मधील मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केले, तर आमचे मतदान गेले कुठे? (Sujat Ambedkar)
सुजात आंबेडकर म्हणाले, रस्त्यावरच्या लढाईप्रमाणेच आता न्यायालयातही ही लढाई लढावी लागणार आहे. ही लढाई आपण हरलेली नाही. पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत आपणच जिंकणार आहोत.
यावेळी सभेत सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, नगरसेविका करूणा मेघानंद जाधव, अनुजा जगताप, सुनीता चव्हाण, रवी चव्हाण, मेघानंद जाधव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Sujat Ambedkar)
सुजात आंबेडकर यांनी सांगितले की, आता प्रभाग २४ मधील मतदानाबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून धांदल झाल्याचे तपासले जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.






