Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

mosami kewat by mosami kewat
February 17, 2026
in बातमी, राजकीय, सांस्कृतिक
0
जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल
       

औरंगाबाद : “साहित्याचा विचार करताना जो माणूस जातीवाद आणि भेदाभेद मानतो, त्याला साहित्यिक म्हणता येणार नाही. समाजातील या जातीभेदाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत भूमिका घेतली जात नाही, तोपर्यंत साहित्याला व्यापकत्व येत नाही,” असे परखड मत लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले. 

‘विद्रोही सांस्कृतिक चळवळी’च्या वतीने रविवारी एन-३ सिडको येथील जिजाऊ सभागृहात नांदेड येथील होणाऱ्या २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे अध्यक्षस्थानी होते, तर डॉ. संजय मून, डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना लोकनाथ यशवंत म्हणाले की, “भारतीयांच्या डीएनएमधून जात जात नाही आणि लोक आजही आडनावावरून जात ओळखतात, म्हणूनच मी आडनाव लावणे सोडले आहे,” माझ्या लहानपणी वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मित्र सुटत गेले आणि त्यातूनच कविता सुचू लागली. अमरावतीमध्ये एका वृद्ध मजुराला मालकाकडून मिळणारी अमानुष मारहाण पाहून मी अस्वस्थ झालो आणि त्याचे दुःख शब्दांत मांडले. “जगाचे कल्याण व्हावे आणि प्रत्येकाला दोन वेळचे अन्न मिळावे हीच माझी भूमिका आहे, कारण पोट रिकामे राहिले तर माणसे गुन्हेगार होतात,” असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, महात्मा फुले यांनी साहित्य संमेलनावर लिहिलेले पत्र हेच विद्रोही साहित्याचे सूत्र आहे. जातीचे परिप्रेक्ष्य तोडणे हेच विद्रोही साहित्याचे खरे काम असून, आधुनिक कवितेचे जनक केशवसुत नसून सावित्रीबाई फुले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. संजय मून यांनी लोकनाथ यशवंत यांना ‘आजच्या पिढीचा आवाज’ संबोधले. त्यांच्या कवितेला उर्दू शायरीप्रमाणे उत्स्फूर्त दाद मिळते आणि ती शब्दांपेक्षा अधिक आशयाने खुलते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भारत शिरसाट यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले तर आभार डॉ. वैजनाथ कदम यांनी मानले. या सोहळ्याला पत्रकार साहित्यिक भाऊ भोजने, डॉ.अरुणा लोखंडे, डॉ. कमलाकर गंगावणे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. यशवंत खडसे, संजय वरकड, डॉ. रेखा मेश्राम, अँड. वैशाली डोळस, वा. ना. भालेराव, डॉ. सविता लोंढे, आशा डांगे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ. भगवान धांडे, संगीता अंभोरे, मंगल मुन, डॉ सुभाष बागल, सुधाकर निसर्ग, डॉ. द्रौपदी पंदीलवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


       
Tags: aurangabadCast systemConstitutionEquityMaharashtraऔरंगाबाद
Previous Post

अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

Next Post
डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

डिजिटल इंडियाचा बोजवारा! PMPML बसमध्ये ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन
बातमी

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

by mosami kewat
March 9, 2026
0

मिरा-भाईंदर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read moreDetails
पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

March 9, 2026
राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

March 9, 2026
जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

March 9, 2026
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : आकड्यांमागील आर्थिक राजकारण

March 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home