Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 12, 2025
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र !
0
SHARES
200
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

बांगलादेशातील बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक पावले उचला

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा यांच्या कठीण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या, विशेषतः बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक पावले उचलावीत. यासाठी विनंती करण्यात आली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे की,

प्रिय पंतप्रधान मोदी

,बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याक आणि आदिवासी लोकांविरुद्ध, विशेषतः बौद्ध आणि चकमा यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल मी तुम्हाला लिहित आहे.बांगलादेशातील हिंदूवरील हिंसाचाराच्या समर्थनार्थ आणि निषेधार्थ भारत सरकारने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. परंतु, बौद्ध आणि चकमा या अल्पसंख्याक समुदायाविषयी भूमिका घेण्यात आली नाहीये.

बांगलादेशात बौद्ध आणि चकमांना तोंड द्यावे लागत असलेल्या हिंसाचार आणि भेदभावाबद्दल मला खूप चिंता आहे. ज्यांच्या मदतीसाठी आणि हस्तक्षेपासाठीच्या विनंतीकडे भारत सरकार आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांना त्यांच्या पदावरून अनैतिकरित्या काढून टाकल्यापासून, मी बौद्धांवरील हल्ले, त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड, बांगलादेशातील त्यांच्या मालमत्तेची तोडफोड आणि चितगाव डोंगराळ भागात स्थानिक चकमा गटांवर हल्ले आणि त्यांची दुकाने, घरे जाळणे यासारख्या त्रासदायक घटना पाहिल्या आहेत.

बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अल्पसंख्याक असलेल्या बौद्धांवर सुरू असलेले हल्ले हे २०१२च्या रामू हिंसाचाराचे प्रतिध्वनी आहेत.

बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा यांच्या कठीण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की, बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या, विशेषतः बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक पावले उचलावीत.


       
Tags: indianarendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी शिवसेनेचा मविआ सोडण्याचा निर्णय – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

EVM विरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क