Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 10, 2024
in राजकीय
0
असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.
       

‘वंचित’ च्या किमान समान कार्यक्रमात असंघटित कामगारांचा विचार !

मुंबई: ग्रामीण आणि शहरी भागातील असंघटित, कंत्राटी आणि तात्पुरत्या कामगारांचे किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा निर्माण करणे, तसेच विडी, यंत्रमाग, बांधकाम आणि साखर उद्योगातील असंघटित कामगारांच्या मोठ्या वर्गाची, तसेच घरगुती कामगार, मध्यान भोजन योजना कामगार, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी आणि अशा सेविकांची स्थिती गंभीर आहे. ती तातडीने सोडवण्याची गरज आहे. घरकुलांचा प्रश्नही गंभीर आहे. त्यावर आश्वासक धोरण ठरवणे देखील गरजेचे आहे. असा मुद्दा वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रमात मांडला आहे. महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश एकत्रित जाहीरनाम्यात व्हावा, अशी अपेक्षा आहे. निवडणूक जवळ येत असल्याने वंचितच्या मसुद्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही मुद्दे समोर येतात का, हे आता पाहावे लागणार आहे.

देशातील भाजप सरकारच्या लोकविरोधी, असंवेदनशील आणि भ्रष्टाचारी धोरणांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत सातत्याने घसरण होत आहे. बारकाईने पाहिले तर लक्षात येते की, विकासाचे मुख्य लाभार्थी नेहमीच शहरी आणि ग्रामीण श्रीमंत राहतात. दुसरीकडे कामगार शेतकरी, शेतमजूर आणि कारागिर यांच्यासारख्या मूलभूत वर्गांची आणि दलित, आदिवासी लोकसंख्यांक भटक्या जमाती ओबीसी मधला मोठा वर्ग आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाची स्थिती गंभीर असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे.


       
Tags: CongressMaharashtramahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वंचितने सुचवला ठोस उपाय.

Next Post

महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बातमी

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by mosami kewat
October 30, 2025
0

परभणी : औरंगाबाद येथे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीने RSS कार्यालयावर 'जन आक्रोश मोर्चा' काढल्यानंतर सोशल मीडियावर बाळासाहेब...

Read moreDetails
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025
बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

October 30, 2025
अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव

अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home