Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा भयावह आकडा: साडेसहा महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

mosami kewat by mosami kewat
July 17, 2025
in बातमी
0
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा भयावह आकडा: साडेसहा महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा भयावह आकडा: साडेसहा महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

       

‎
‎औरंगाबाद : कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, गेल्या साडेसहा महिन्यांत (१ जानेवारी ते ११ जुलै २०२५) तब्बल ५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यापैकी केवळ ३३९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांनाच शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे, तर अनेक प्रकरणे अजूनही चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहेत.
‎
‎बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
‎
‎या आकडेवारीत बीड जिल्हा सर्वाधिक बाधित ठरला आहे. बीडमध्ये या वर्षात १३६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यापैकी ९३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर १९ अपात्र ठरली असून, २४ प्रकरणे चौकशी व निर्णयासाठी प्रलंबित आहेत.
‎
‎इतर जिल्ह्यांची स्थिती
‎
‎बीडनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. येथे ६० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, ११ अपात्र ठरली, तर २५ प्रकरणे प्रलंबित आहेत.
‎
‎इतर जिल्ह्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे:

‎ 1) नांदेड: ७६ आत्महत्या (५३ पात्र, ३ अपात्र, २० प्रलंबित)
‎
‎ 2) परभणी: ६५ आत्महत्या (२९ पात्र, १८ अपात्र, १८ प्रलंबित)
‎
‎ 3) धाराशिव: ६६ आत्महत्या (४४ पात्र, ९ अपात्र, १३ प्रलंबित)
‎
‎ 4) लातूर: ३९ आत्महत्या (२६ पात्र, १३ प्रलंबित)
‎
‎ 5) जालना: ३४ आत्महत्या (१८ पात्र, १६ प्रलंबित)
‎
‎शेतकऱ्यांच्या या वाढत्या आत्महत्या चिंताजनक असून, शासनाने या गंभीर समस्येवर तातडीने आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते. अनेक प्रकरणांमध्ये मदतीसाठी लागणारा विलंब आणि अपात्र ठरविल्या जाणाऱ्या प्रकरणांची संख्या पाहता, प्रशासकीय स्तरावरही अधिक पारदर्शकतेची आणि संवेदनशीलताची आवश्यकता आहे.
‎


       
Tags: beedFarmerMaharashtraMarathwadasuicide
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीला पाठिंबा नाही!

Next Post

जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद!

Next Post
जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद!

जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत निषेध बैठक
बातमी

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत निषेध बैठक

by mosami kewat
July 19, 2025
0

‎मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच विधानसभेत पारित केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज मुंबई पत्रकार संघात एका निषेध बैठकीचे आयोजन...

Read moreDetails
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: विरोधकांच्या संमतीनेच मंजूर - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: विरोधकांच्या संमतीनेच मंजूर – देवेंद्र फडणवीस

July 19, 2025
शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

July 19, 2025
वंचित बहुजन आघाडीचा 'महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका'ला तीव्र विरोध

‎वंचित बहुजन आघाडीचा ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका’ला तीव्र विरोध

July 19, 2025
मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

July 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home