Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचितकडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

mosami kewat by mosami kewat
July 1, 2025
in बातमी
0
Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

       

‎मुंबई: विक्रोळी येथील ६६ कोटी रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी उभारलेला उड्डाणपूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. यामुळे करत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ‎ ‎

टागोर नगर आणि एलबीएस मार्गाला जोडणारा हा उड्डाणपूल वाहतूक सुरळीत करण्याऐवजी स्वतःच एक अडथळा बनल्याने दररोजच्या वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने स्थानिक संतप्त झाले आहे. ‎ ‎वंचित बहुजन आघाडीचे विक्रोळी तालुका अध्यक्ष अजय खरात यांनी या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

“६६ कोटी रुपये खर्च करून तयार झालेला पूल अवघ्या सात वर्षांतच समस्यांचे कारण बनतो, हे धक्कादायक आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने तपासणी करणे आवश्यक आहे,” असे खरात म्हणाले. ‎ ‎

वंचित बहुजन आघाडीने स्थानिक प्रशासनाकडे या उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत असलेल्या डिझाइनमधील त्रुटी किंवा इतर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ब्रिजला डिव्हाईडर टाकण्याची आणि आरटीओ बीट नेमण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी बनवण्यात येणाऱ्या स्तंभाला अशोक स्तंभ असे नाव देण्याचीही मागणी केली आहे.


       
Tags: demandstraffic jamvbaforindiaVikhroli bridge
Previous Post

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण महाराष्ट्र राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणी : पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण महाराष्ट्र राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणी : पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण महाराष्ट्र राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणी : पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप
बातमी

ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप

by mosami kewat
January 15, 2026
0

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर...

Read moreDetails
पुण्यात ‘शाही’चा खेळ की बोगसगिरीचा मेळ? मार्कर पेनच्या पुसट खुणांनी निवडणूक प्रक्रियेचे वाभाडे!

पुण्यात ‘शाही’चा खेळ की बोगसगिरीचा मेळ? मार्कर पेनच्या पुसट खुणांनी निवडणूक प्रक्रियेचे वाभाडे!

January 15, 2026
प्रभाग ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनीत फेक मतदानाचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

प्रभाग ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनीत फेक मतदानाचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

January 15, 2026
सुजात आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क; ‘लोकशाही बळकट करण्यासाठी घराबाहेर पडा’ असे केले आवाहन

सुजात आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क; ‘लोकशाही बळकट करण्यासाठी घराबाहेर पडा’ असे केले आवाहन

January 15, 2026
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

January 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home