अहमदनगर: अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Sangram Jagtap controversial statement)
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष सत्तार हबीबसाब शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, आमदार संग्राम जगताप यांनी भाषणादरम्यान आणि बोलताना मुस्लिम समाजाबद्दल ‘लांडे’ असे अपशब्द वापरले आहेत. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
या घटनेमुळे महाराष्ट्राचे वातावरण बिघडून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. सत्तार शेख यांनी विनंती केली आहे की, आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी करावे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. (Sangram Jagtap controversial statement)
अन्यथा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...
Read moreDetails






