Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 22, 2024
in सामाजिक
0
आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?
       

आकाश शेलार

आज शहरात आणि खेड्यांत जो ओबीसी समाज मध्यमवर्गीय म्हणून राहत आहे. त्याचे श्रेय जाते मंडल आयोगाला. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये मंडल आयोग लागू व्हावा म्हणून संसदेत भूमिका मांडणारे आणि मंडल आयोग लागू करून घेणारे ॲड. बाळासाहेब आंबेडकर होते. १९९० या काळात बहुजनांच्या हिताच्या अनेक गोष्टी अवघ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात पार पडल्या. ज्या काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकल्या नाहीत. परिवर्तनाचे राजकारण काय असते हे त्यावेळी बाळासाहेबांनी दाखवून दिले. याबाबत सध्याच्या अनेक युवकांना कदाचित माहिती नसेल. तेव्हापासून आजतागायत बाळासाहेबांची भूमिका तसूभरही बदललेली नाही.

मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले, तेव्हा बाळासाहेब हे मनोज जरांगे यांना भेटले होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका घेतली होती. मात्र, त्यांनी वेळोवेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असावे हे सुद्धा स्पष्ट केले होते. अशी ठाम आणि स्पष्टभूमिका घेणारे राज्यात बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेतृत्व आहे. नेते आहेत.

राजकीय पंचाईत होऊ नये म्हणून अनेक पक्ष भूमिका घ्यायला घाबरत आहेत. परंतु, प्रस्थापित पक्षांनी भूमिका न घेतल्याने आज ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे. जात हा घटक पुन्हा डोकं वर काढून उभा राहत आहे. अशा वेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा आशादायक असेल. ओबीसींच्या मनात त्यांचे आरक्षण संपते की काय ? अशी भीती आहे. एस. सी. /एस. टी यांची परिस्थिती देखील तशीच आहे. परंतु, कोणताही राजकीय पक्ष स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर जातीय तेढ कमी करतील आणि महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होईल अशी आशा ओबीसी आणि मराठा समाजाला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. मात्र, महाविकास आघाडीचा एकही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे की, ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, तर ओबीसी समूहाला ही मागणी मान्य नाही. त्यामुळे गावागावात, खेडोपाडी जातीय संघर्ष वाढत आहे. राज्याचा सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचे दिसत आहे. अशावेळी प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी वगळता याबाबत ठाम भूमिका कोणताही पक्ष घेताना दिसत नाही. त्यानं केवळ आपल्या मतांची बेरीज वजाबाकी जमते. त्यांना जनतेचा प्रश्न महत्वाचा वाटत नाही. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, जे केवळ मतांचं राजकारण करीत नाहीत तर कोणत्याही समाजात शांतता राहिली पाहिजे, यासाठी सुरुवातीपासून पुढाकार घेत आले आहेत.

मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना झुलवत ठेवून सत्ताधारी पक्ष आणि भूमिका न घेणारे विरोधी पक्ष काय साध्य करू पाहत आहेत ? वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती की, पत्राच्या माध्यमातून या पक्षांना आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्यास सांगावे. मात्र, त्यांनी पत्र पाठवले की नाही आणि जरी पाठवले असले तरी यांनी भूमिका जाहीर केली की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, अशावेळी सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्नाला असेच पेटवत ठेवून राजकीय पोळी भाजू इच्छित असल्याचे दिसते. मात्र, सामाजिक सलोखा धोक्यात येऊन गावोगावी जातीय संघर्ष वाढत आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे अशी भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव यात्रा काढून करत आहे.

फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र जातीच्या अग्नीत जळू नये आणि सामाजिक सलोखा अबाधित रहावा, यासाठी राजकीय पक्षांनी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. सभा, संमेलनातून फुले – शाहू – आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करण्यात सध्याच्या पुढाऱ्यांना रस आहे. मात्र, महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाज स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षांनंतरही हे प्रस्थापित पुढारी निर्माण करू शकलेले नाहीत.

25 जुलै रोजी ॲड..बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेला मुंबई चैत्यभूमीतून सुरुवात होणार आहे. या यात्रेने समाजात जातीय संघर्षाने निर्माण झालेला गढूळपणा दूर होईल अशी अपेक्षा आहे. विविध ओबीसी, मराठा संघटना आणि त्यांचे नेते या यात्रेला समर्थन देत आहे. या यात्रेमुळे राज्याच्या राजकारणाला एक परिवर्तनवादी दिशा मिळेल, असा विश्वास या यात्रेच्या संयोजकांनी व्यक्त केला आहे.


       
Tags: ArakashanBachavYatraMaratha ReservationobcPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

एससी, एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"
बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

by Tanvi Gurav
July 17, 2025
0

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025
सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home