Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीला 400 कोटींचे बजेट द्या

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 21, 2024
in बातमी
0
बार्टीला 400 कोटींचे बजेट द्या
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप तसेच स्पर्धा परीक्षांचे क्लासेस, स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम समतादुतांचे कार्य तसेच संविधान जागृतीसंदर्भात कार्यक्रम अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम राबवले जातात. मात्र, या वार्षिक बजेटमध्ये बार्टीला फक्त 75 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तेच, सारथी आणि महाज्योती या संस्थांना 365 कोटी देण्यात आले आहेत. त्यामुळे शासन दुजाभाव करीत असून, बार्टीला वाढीव निधी म्हणून 400 कोटी रुपये देण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रातील  फुले – शाहू – आंबेडकरवादी संस्था, संघटना पक्ष यांच्या रेट्यामुळे ओबीसी समूहासाठी ‘महाज्योती’ मराठा समुहासाठी ‘सारथी’ची निर्मिती करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अनेक प्रयत्नांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने बार्टीच्या धर्तीवर  “सारथी” ‘आणि “महाज्योती”ची निर्मिती केली आहे.

या तिन्ही संस्थांचे वार्षिक बजेट जवळपास समान आहे. तिन्ही संस्थांचे वार्षिक बजेट जवळपास 365 कोटी रुपये आहे. राज्य सरकारने व महाराष्ट्र शासनाने सारथी आणि महाज्योती या संस्थांना 365 कोटी रुपये हस्तांतरित केले. मात्र, बार्टीला फक्त 75 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती सम्यक विद्यार्थी आंदोनाने दिली आहे.

आरक्षित वर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये महाराष्ट्र शासन दुजाभाव करीत आहे. तो भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करत  आहे, आरक्षित वर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये भांडणे  लावण्यापेक्षा बार्टीला वाढीव निधी म्हणून 400 कोटी रुपये देऊन हा भेदभाव महाराष्ट्र शासनाने संपावावा ही अपेक्षा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या जातीयवादी चुकीच्या धोरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सम्यकच्या शिष्टमंडळाने संबंधित घटनेचा निषेध नोंदवून बार्टी या संस्थेचे बजेट वाढवून सरकारने तकाळ द्यावे यासंदर्भात निवेदन दिले.

सरकार व प्रशासनाने गंभीर दखल नाही घेतली तर येत्या काळात सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.


       
Tags: BARTISamyak Vidyarthi AndolanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

फोर्स मोटर्सकडून आचारसंहितेचा भंग

Next Post

खोट्या, मनघडत गोष्टींवर विश्वास ठेवू नका !

Next Post
खोट्या, मनघडत गोष्टींवर विश्वास ठेवू नका !

खोट्या, मनघडत गोष्टींवर विश्वास ठेवू नका !

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
बातमी

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

रायगड - किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या ...

June 7, 2025
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक
बातमी

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक

मुंबई - आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी संघाचे मार्केटींग हेड निखील सोसाळे यांच्यासह तिघांना अटक करण्यात ...

June 7, 2025
बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचारप्रकरणी माजी रोखपालला 10 वर्षांची शिक्षा
बातमी

बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचारप्रकरणी माजी रोखपालला 10 वर्षांची शिक्षा

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाप्रकरणी राज्य विधिमंडळ सचिवालयातील माजी रोखपालाला विशेष न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली ...

June 7, 2025
रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा
बातमी

रिझर्व बॅकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात, अर्धा टक्के व्याजदर कपातीमुळे कर्जदारांना दिलासा

मुंबई - भारतीय 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने व्याजदरात मोठी कपात केली आहे. सलग तिसरी व्याजकपात करताना ती अर्धा टक्क्यांनी ही ...

June 7, 2025
मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे - मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र युद्धानंतर भारताच्या बाजून एकही देश का उभा राहिला नाही याबाबत लोकांनी मोदी,भाजप आणि ...

June 6, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क