अकोला : पातूर तालुक्यात ग्राम पिंपळडोळी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित विविध शिबिरांचा समारोप सोहळा आणि एकदिवसीय भव्य धम्म परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.
पातूर तालुक्याच्या वतीने दहा दिवसीय श्रामनेर बौद्धाचार्य शिबिर, तसेच तालुक्यातील विविध दहा गावांमध्ये महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरे आणि समता सैनिक दल शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
Also Read : ‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन
या सर्व शिबिरांचा समारोपीय कार्यक्रम ग्राम पिंपळडोळी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भदंत राज ज्योतीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. धम्म परिषदेचे उद्घाटन भिमराव तायडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास पातूर तालुक्याचे अध्यक्ष राजेश सरकटे, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे, प्रमुख मार्गदर्शक व जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे (अकोला), जिल्हा महिला अध्यक्षा इंदुताई मेश्राम, सरचिटणीस प्रज्ञा इंगळे, जिल्हा संघटक सुखदेवराव पाटील, जिल्हा कार्यालयीन सचिव सदाशिव मेश्राम, तालुका सरचिटणीस गोपाल खंडारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व आयोजक मंडळ उपस्थित होते.
Also Read : बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!
या धम्म परिषदेस परिसरातील हजारो उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. विविध शिबिरांमधून बौद्ध धम्माचे विचार, आचार आणि सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.






