औरंगाबाद : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना एका सफाई कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल दिनकर जाधव असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग काढताना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, प्रशासकीय हलगर्जीपणावर बोट ठेवले जात आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनधिकृत बॅनर काढण्याचे आदेश दिले होते. (Aurangabad News)
या मोहिमेदरम्यान अनिल जाधव हे बॅनर काढण्यासाठी गेले असता, त्यांचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाला. बॅनर काढताना विद्युत विभाग किंवा महावितरणच्या (MSEB) कर्मचाऱ्यांना सोबत घेणे अनिवार्य होते, मात्र तसे न केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेसाठी पूर्णपणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. (Aurangabad News)
दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला महापालिकेकडून १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी प्रशासनाकडे मागणी करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, पश्चिम शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Aurangabad News)
महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगाराचा मृत्यू; १ कोटींच्या मदतीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
औरंगाबाद : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना एका सफाई कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली...
Read moreDetails





