Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
December 17, 2025
in बातमी, सामाजिक
0
हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
       

श्रीरामपूर : “न्याय हक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक संदेश देणाऱ्या हरेगाव (ता. श्रीरामपूर) या स्वाभिमान भूमीत १६ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा अहमदनगर (उत्तर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. १० दिवसीय श्रामनेर शिबिराचा प्रारंभ या महोत्सवाचा मुख्य भाग म्हणून दि. ७ डिसेंबर २०२५ पासून १० दिवसीय श्रामनेर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हरेगाव येथील स्वाभिमान भूमीत हे शिबीर संपन्न झाले.

सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिस्तबद्ध संचलनाद्वारे समता सैनिक दलाने मानवंदना दिली.

या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर होते.

यावेळी संस्थेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ऍड सुभाष जौजाळे, ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड एस के भंडारे,ट्रस्टी डॉ राजाराम बडवे, राज्याचे अध्यक्ष यु. जी.बोराडे, सरचिटणीस अशोक केदारे, राज्य उपाध्यक्ष उत्तम मगरे , नाशिक विभाग प्रभारी/राज्य संघटक गौरव पवार , तसेच प्रमुख उपस्थिती होते. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते आणि भारतीय बौद्ध महासभेचे राज्य व राष्ट्रीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनपर मनोगतानंतर, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे अध्यक्ष शांताराम रणशूर होते. व सूत्रसंचालन नरेंद्र पवार, गौतम पगारे,संतोष बनसोडे यांनी केले. आभार विजय जगताप,बिपीन गायकवाड यांनी केले.

समता सैनिक दलाची जबाबदारी संरक्षण उपाध्यक्ष इंजि अतिष त्रिभुवन यांनी यशस्वी पूर्ण केली.

१६ डिसेंबर १९३९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीत अन्यायाविरुद्ध लढण्याचा मंत्र दिला होता. त्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते


       
Tags: buddhismBuddhistCampaignDr Babasaheb AmbedkarMaharashtrapoliticsShrirampurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

Next Post

संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा ‘बळी’; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी

Next Post
संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा ‘बळी’; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी

संतापजनक! कर्जाच्या विळख्यात बळीराजाचा 'बळी'; १ लाखासाठी विकली स्वतःची किडनी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश
बातमी

NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश

by mosami kewat
June 20, 2026
0

पुणे : पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि. १९) नीट पेपरफुटी विरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात आले....

Read moreDetails
परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

June 19, 2026
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

June 19, 2026
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home