पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत भारताच्या संविधासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके विक्री केली जाते. मात्र, ही पुस्तके नुकतीच कचऱ्यात सापडली आहेत. त्यामुळे बार्टी विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी भारतीय संविधानाच्या प्रती, महापुरुषांच्या पुस्तकांची तसेच संविधान प्रस्ताविकेची विटंबना केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर “सुनील वारे हटाव – बार्टी बचाव” या घोषवाक्याखाली दुपारी २ वाजता समाजकल्याण कार्यालय, आगरकर नगर (पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, पुणे स्टेशन) येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
संविधान व महापुरुषांचा अपमान तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान या गंभीर घटनेविरोधात आंदोलनादरम्यान सुनील वारे यांची तात्काळ हकालपट्टी, निलंबन व बडतर्फीची मागणी आली.
या आंदोलनाचे नेतृत्व सागर आल्हाट (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर) करणार असून, या प्रसंगी ॲड. अरविंद तायडे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर), अनिता चव्हाण (अध्यक्षा, वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर), चैतन्य इंगळे (अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर), विशाल कसबे (अध्यक्ष, माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियन, पुणे शहर) आणि पद्यश्री साळवे (अध्यक्ष, रेल्वे कामगार आघाडी, पुणे शहर) उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने सर्व संविधानवादी, बहुजनवादी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होते.