Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 12, 2025
in बातमी, मुख्य पान
0
औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

       

औरंगाबाद – शहरातील आंबेडकरनगर, फुले नगर, आणि गौतम नगर परिसरातील अतिक्रमणाच्या कारवाईमुळे घरांवर टांगती तलवार आलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांनंतर अखेर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी १५० घरांच्या पुनर्वसनास मंजुरी दिली आहे.

या भागातील अतिक्रमण हटवताना अनेक गोरगरीब कुटुंबांच्या निवाऱ्यावर गदा येणार होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगळ यांनी जोरदार पाठपुरावा करत नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी १५० घरांचे पुनर्वसन निश्चित करत लवकरच त्या घरांच्या चाव्या संबंधित लाभार्थ्यांना सुपूर्त करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच अतिक्रमणाच्या कारवाईत पाडण्यात येणाऱ्या ‘कमान बुद्ध विहारा’बाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हे बुद्ध विहार पुन्हा नव्याने बांधून देण्यात येईल, असे आश्वासन स्वतः आयुक्त श्रीकांत यांनी दिले आहे.

या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. अमित भुईगळ यांनी याबाबत म्हटले, “आमचा लढा फक्त अतिक्रमणाविरुद्ध नाही, तर गरिबांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आहे. हे पुनर्वसन म्हणजे न्यायाचा विजय आहे.”

या निर्णयामुळे औरंगाबाद शहरातील नागरी प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेतील विश्वास नवी दिशा घेत आहे.


       
Previous Post

गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना: युवा टेनिसपटू राधिका यादवची वडिलांकडूनच हत्या

Next Post

म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

Next Post
म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप
बातमी

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

by mosami kewat
March 12, 2026
0

सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर...

Read moreDetails
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home