Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 12, 2025
in बातमी, मुख्य पान
0
औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

       

औरंगाबाद – शहरातील आंबेडकरनगर, फुले नगर, आणि गौतम नगर परिसरातील अतिक्रमणाच्या कारवाईमुळे घरांवर टांगती तलवार आलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांनंतर अखेर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी १५० घरांच्या पुनर्वसनास मंजुरी दिली आहे.

या भागातील अतिक्रमण हटवताना अनेक गोरगरीब कुटुंबांच्या निवाऱ्यावर गदा येणार होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगळ यांनी जोरदार पाठपुरावा करत नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी १५० घरांचे पुनर्वसन निश्चित करत लवकरच त्या घरांच्या चाव्या संबंधित लाभार्थ्यांना सुपूर्त करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच अतिक्रमणाच्या कारवाईत पाडण्यात येणाऱ्या ‘कमान बुद्ध विहारा’बाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हे बुद्ध विहार पुन्हा नव्याने बांधून देण्यात येईल, असे आश्वासन स्वतः आयुक्त श्रीकांत यांनी दिले आहे.

या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. अमित भुईगळ यांनी याबाबत म्हटले, “आमचा लढा फक्त अतिक्रमणाविरुद्ध नाही, तर गरिबांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आहे. हे पुनर्वसन म्हणजे न्यायाचा विजय आहे.”

या निर्णयामुळे औरंगाबाद शहरातील नागरी प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेतील विश्वास नवी दिशा घेत आहे.


       
Previous Post

गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना: युवा टेनिसपटू राधिका यादवची वडिलांकडूनच हत्या

Next Post

म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

Next Post
म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शेयर मार्केटचे नजीकच्या काळात नक्की काय होईल? वधारेल का कोसळेल?
अर्थ विषयक

शेयर मार्केटचे नजीकच्या काळात नक्की काय होईल? वधारेल का कोसळेल?

by mosami kewat
October 16, 2025
0

संजीव चांदोरकर गेल्या काही वर्षात शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या काही पटींनी वाढली आहे. विशेषतः त्यांच्यासाठी ट्रम्प यांच्या तिकडम बाजीमुळे...

Read moreDetails
Akola : मुर्तीजापूर तालुक्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी वानखडे कुटुंबीयांनी सुजात आंबेडकर यांची घेतली भेट!

Akola : मुर्तीजापूर तालुक्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी वानखडे कुटुंबीयांनी सुजात आंबेडकर यांची घेतली भेट!

October 16, 2025
‘मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर’ होऊन काम करा, कार्यकर्त्यांना सुजात आंबेडकर यांचे आवाहन

‘मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर’ होऊन काम करा, कार्यकर्त्यांना सुजात आंबेडकर यांचे आवाहन

October 16, 2025
ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन; 'महाभारत'च्या कर्णाची 68 व्या वर्षी अखेर

ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’च्या कर्णाची 68 व्या वर्षी अखेर

October 15, 2025
भीषण दुर्घटना! जैसलमेरमध्ये धावत्या एसी स्लीपर बसला आग, २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू; १६ गंभीर जखमी

भीषण दुर्घटना! जैसलमेरमध्ये धावत्या एसी स्लीपर बसला आग, २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू; १६ गंभीर जखमी

October 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home