मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील खंडोबा टेकडी, पंचशीलनगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते व नाले दुरुस्तीच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी वर्गाच्या हलगर्जी कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, त्या कामाकडे प्रशासनाने पुरेसे लक्ष न दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. योग्य सुरक्षितता उपाययोजना न केल्यामुळे डोंगराचा भाग घसरून घरे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. (Ghatkopar Panchsheel Nagar protest)
या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे घाटकोपर तालुका समन्वयक समीर रत्नप्रभा रमाकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘एन’ विभाग कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
आंदोलनात वॉर्ड क्रमांक १२७ चे वॉर्ड समन्वयक निखिल अशोक ठोंबरे, महिला वॉर्ड समन्वयक साक्षी वाघमारे, वॉर्ड क्रमांक १२८ च्या माजी महिला अध्यक्षा नंदा गायकवाड यांच्यासह संगीता आचार्य, आकाश वाघमारे, कविता चिलवंत, सना शेख, सविता रणदिवे, उषा सोनवणे, आशा खरात, सरसाबाई गाडगे, अविनाश अहिरे, पोपट रणदिवे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ghatkopar Panchsheel Nagar protest)
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुरक्षितता उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे सांगितले. नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
अहमदनगर : भिंगार येथील ‘बोगस’ जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा
अहमदनगर : भिंगार येथील यशवंत नगर, शहापूर, केकती आणि डेअरी फार्म परिसरातील जमिनीची झालेली खरेदी बोगस असून ती तातडीने रद्द...
Read moreDetails






