Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उन्नाव येथे दलित तरुणीचे अपहरण आणी हत्या; राजकारण तापलं.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
Unnao आरोपी राजोल सिंघ

आरोपी राजोल सिंघ

       

उन्नाव : उत्तरप्रदेशात उन्नाव (Unnao) पुन्हा चर्चेत आलं आहे. येथील एका दलित तरुणीच्या अपहरण व हत्येचं प्रकरण समोर आलं आहे.

उन्नाव (Unnao) येथील २२ वर्षांची एक दलित तरुणी २ महिन्यांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह ज्या जागेवर सापडला ती जागा समाजवादी पक्षाचे माजी नेते फतेह बहादूर सिंघ याच्या आश्रमा जवळ आहे.

फतेह बहादूर सिंघ हे समाजवादी पक्षाचे सरकार असताना मंत्री देखील होते. त्यांचा मुलगा राजोल सिंघ हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे.

मृत तरुणीच्या आईने आधीच राजोल सिंघ वर संशय व्यक्त केला होता, परंतु त्यावेळी स्थानिक पोलिसांनी कार्यवाही केली नाही. यामुळे एकाला बडतर्फ केल्याची माहिती उन्नाव पोलिसांनी दिली.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मधातच हे प्रकरण समोर आल्याने यावर राजकारणही तापल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी तरुणीच्या आईशी फोनवर चर्चा केली. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उर्फ अजय बिष्ट यांना लक्ष करत कारवाईची मागणी केली.

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी समाजवादी पार्टीला लक्ष केले. समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या जमिनीत मृतदेह मिळाला असे म्हणत, हि घटना दुःखद असून राज्य सरकारने त्वरीत कारवाई करावी अशी मागणीही केली.

समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी त्या व्यक्तीचा पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. जी व्यक्ती पक्षात होती (आरोपीचे वडील) ती ४ वर्षांपूर्वीच मरण पावल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोपी राजोल सिंघ हा पक्षाचा सदस्य नसून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पोलीस व प्रशासनाने आरोपीवर कारवाई करावी अशी मागणीही केली.


       
Tags: DalitUnnao
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण

Next Post

वंचित : आंबेडकरी राजकारणाचा नवीन आयाम !

Next Post
वंचित : आंबेडकरी राजकारणाचा नवीन आयाम !

वंचित : आंबेडकरी राजकारणाचा नवीन आयाम !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!
अर्थ विषयक

आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

by mosami kewat
December 16, 2025
0

आपल्याला काय फरक पडतो ? जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध...

Read moreDetails
कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

December 16, 2025
जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

December 16, 2025
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

December 15, 2025
भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

December 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home