पुणे – अकरावी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी आज दि ५ जून रोजी दुपारी दोन वाजता संपली आहे. काल ४ जून अखेर राज्यातील तब्बल १२ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन नोंदनी केली आहे. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत असून विद्यार्थ्यांना ऑफलाईन नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
आज दुपार पर्यंत अकरावी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी सुरु होती. आज गुरुवारी (दि. 5) नोंदणीचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार होती. मात्र, अर्ज नोंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची नोंदणी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
मागील दहा दिवसांपासून अकरावी प्रवेशासाठी अर्जाची ऑनलाइन नोंदणी सुरु आहे. राज्यात १२ लाख २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बाकीचे विद्यार्थी नोंदणी करत आहेत. परंतु नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी होत नसल्याची तक्रार विद्यार्थी, पालकांतून होत आहे. त्यामुळे प्रवेश नोंदणीसाठी आणखी काही दिवस मुदत मिळावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
ऑफलाईन प्रवेश द्या
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत आज गुरुवारी दुपारी दोन वाजता संपत आहे. मुदतवाढ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना ऑफलाईन प्रवेश मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी पाठपूरावा करत आहे.