Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांचा सदिच्छा आणि संदेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 4, 2024
in बातमी
0
‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांचा सदिच्छा आणि संदेश !
       

प्रबुद्ध भारत वर्तमान आणि भविष्य समजावून सांगतो !

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक ते प्रबुद्ध भारत’ असा पत्रकारितेचा प्रवाह निर्माण केला. तो बाबासाहेबांनी चालवला. १९३० मध्ये बाबासाहेबांनी ‘जनता’ पाक्षिक सुरू केले. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘जनता’ पाक्षिकाचे रूपांतर “प्रबुद्ध भारत”मध्ये झालं. प्रबुद्ध भारत हे नाव घेतांना भारताचे संविधान लिहले जात होतं. भारताला ‘प्रबुद्ध’ करणे ही गरज होती म्हणून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ हे नाव ठेवले. या मागे लोकांना शहाणे करणे हा बाबासाहेबांचा उद्देश असल्याचे प्रबुद्ध भारतचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारतच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा देत म्हटले आहे.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी अनेक संकटांवर मात करून प्रबुद्ध भारत सुरू ठेवले. गेली अनेक वर्षे आम्ही ‘प्रबुद्ध भारत’ चालवतोय. यासाठी अनेक जण मदत करतात. वर्तमानपत्र हा चळवळीचा आरसा आहे. त्यामुळे हे वर्तमानपत्र चालविण्यासाठी सर्वांनी मदत करावी. मदत म्हणजे त्यांनी सभासद, वर्गणीदार व्हावे. ह्या दोन गोष्टी सर्वांनी केल्या, तर आंबेडकरी चळवळीचे वर्तमानपत्र चालू शकते. आज मोठ्या खेदाने म्हणावं लागतंय की, आंबेडकरी चळवळीतील माणूस हा इतिहासात जगतोय, तो वास्तवात जगत नाही. याचे सर्वात मोठे कारण की, वास्तव काय आहे? वर्तमान काय आहे? हे त्याला कोणी समजवून सांगत नाही असे त्यांनी नमूद केले.

‘प्रबुद्ध भारत’ आज वर्तमानस्थिती काय आहे? भविष्यकाळ काय आहे? हे समजावून सांगतो. म्हणून स्वतःला प्रबुद्ध करून घेण्यासाठी ‘प्रबुद्ध भारत’ वाचण्याचे, आपल्या समोरील आव्हाने समजून घेण्याचे आणि प्रबुद्ध भारतचे वर्गणीदार होण्याचे आवाहनही त्यांनी केले.


       
Tags: Babasaheb AmbedkarbabasahebambedkarprabuddhbharatPrakash Ambedkar
Previous Post

आधी मसुदा, मग बोलणी – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

Next Post

महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.

Next Post
महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.

महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी - राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा
बातमी

जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

by mosami kewat
June 21, 2026
0

लोहा : लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाच्या अवमान प्रकरणी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३...

Read moreDetails
जागतिक सत्तासंघर्षाचे नवे पर्व : जी-७, चीन आणि बदलते जग

जागतिक सत्तासंघर्षाचे नवे पर्व : जी-७, चीन आणि बदलते जग

June 20, 2026
कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित

कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित

June 20, 2026
उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

June 20, 2026
मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

June 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home