Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

दारूड्याची वृत्ती देशासाठी घातक

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 3, 2024
in राजकीय
0
दारूड्याची वृत्ती देशासाठी घातक
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : रावेर मतदारसंघात प्रचार सभा

रावेर : नरेंद्र मोदींची वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक कारखाने विकणार असे म्हणत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

शेतकरी दिल्लीत उपोषणासाठी बसले होते. तेव्हा मोदी घरामध्ये विंग वाजवत बसले होते.संघाच्या कार्यकर्त्यांना मी विचारतो की, तुम्ही मानवतावाद सांगताय. हा कोणता मानवतावाद आहे की, पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटायला तयार नाही, असेही त्यांनी या वेळी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्याला नितीमत्ता नाही. कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात अशा माणसांपासून आपण सावध राहिले पाहिजे. कारण ते नुसते खासदार होत नाहीत, तर पूर्ण राज्य आपण त्याच्या हातात देत असतो, म्हणजे आपली मानगुटी आपण त्यांच्या हातात देत असतो. महाराष्ट्रातले शेतकरी नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. इथे शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. जे काही इथे शेतकरी नेते उभे झाले आहेत ते शेतीमध्ये जे पिकतं त्यावर ज्या प्रक्रिया होतात त्या कारखान्यांचे ते मालक आहेत. ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत. म्हणून यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे.राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला. निवडणूक होऊ नये म्हणून पाठिंबा दिला असे ते सांगत होते. निवडणूक ही या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी चौकशी होऊ नये म्हणून पाठिंबा दिला होता का नाही याचा त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला. निवडणूक होऊ नये म्हणून पाठिंबा दिला असे ते सांगत होते. निवडणूक ही या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी चौकशी होऊ नये म्हणून पाठिंबा दिला होता का नाही याचा त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

भाजप, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे यांना विचारतो की, तुम्ही तेल्याला उमेदवारी का दिली नाही, तुम्ही धनगर समाजाला का उमेदवारी दिली नाही, तुम्ही माळी समाजाला का उमेदवारी दिली नाही. तुम्ही भटक्या विमुक्ताला का उमेदवारी दिली नाही.  उमेदवार हे नात्यागोत्यातले उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्ष सोडा, विचार सोडा पण या देशातील घराणेशाही संपवा तरच लोकशाही या देशात वाचेल असे आवाहनही त्यांनी या सभेत केले.

राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमत्वाला टिकवायचे असेल, तर बाबासाहेब म्हणाले होते की, आर्थिक कणा असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौमत्व टिकत नाही. या बाबासाहेबांच्या विधानाची आठवण आंबेडकर यांनी या वेळी करून दिली.

काँग्रेसवाल्यांना भाजपला उघडे पाडण्याची संधी होती

भाजपने राजीव गांधींना बदनाम केले, आता त्यांचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे. फक्त मोदींची नाही तर भारतीय जनता पार्टीचे आणि आरएसएसला देखील उघडे पाडण्याची वेळ आलेली आहे. ती संधी तुम्ही घालवत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.


       
Tags: LoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarraverVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लोकशाहीचे सामाजिकीकरणकरणे हेच वंचितचे धोरण

Next Post

अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेकरांची परिवर्तन सभा

Next Post
अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेकरांची परिवर्तन सभा

अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेकरांची परिवर्तन सभा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अहमदनगर : भिंगार येथील 'बोगस' जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा
बातमी

अहमदनगर : भिंगार येथील ‘बोगस’ जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

by mosami kewat
February 26, 2026
0

अहमदनगर : भिंगार येथील यशवंत नगर, शहापूर, केकती आणि डेअरी फार्म परिसरातील जमिनीची झालेली खरेदी बोगस असून ती तातडीने रद्द...

Read moreDetails
पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

February 26, 2026
जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

February 26, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती

त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती

February 25, 2026
गरिबांचे मरण आणि बँकांचे 'कमिशन' मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

गरिबांचे मरण आणि बँकांचे ‘कमिशन’ मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

February 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home