Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अखेर पायउतार ! महाराष्ट्राच्या गृहमंत्राचा राजीनामा

Jitratn Usha Mukund Patait by Jitratn Usha Mukund Patait
October 20, 2022
in बातमी
0
अखेर पायउतार ! महाराष्ट्राच्या गृहमंत्राचा  राजीनामा
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुंबई पोलीस कमिशनर परमबिरसिंह यांनी त्यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी निष्पक्ष तपास होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विश्वासातील म्हणुन ओळखले जाणारे एनकाउंटर स्पेशलीस्ट सचिन वाझे यांना एनआयने केलेल्या अटके नंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली होती.

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचीकेवर सुनवाई करताना मुंबई ऊच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला. या आरोप प्रकरणी सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. निर्णयानंतर अन्य कोणताही पर्याय शिल्लक नसलेल्या अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्दा पुढे करत मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख सुप्रिम कोर्टात अपिल करणार आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गृहमंत्री पदावर मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नेमनूक केली आहे.


       
Tags: anildeshmukhCBImaharashtrgovernmentNIAprambirsingh
Previous Post

परिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण ?

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क