Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मराठीला अभिजात दर्जा, पण शाळांना टाळे; २५५ शाळा बंद झाल्याने ग्रामीण शिक्षण धोक्यात!

mosami kewat by mosami kewat
February 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मराठीला अभिजात दर्जा, पण शाळांना टाळे; २५५ शाळा बंद झाल्याने ग्रामीण शिक्षण धोक्यात!

मराठीला अभिजात दर्जा, पण शाळांना टाळे; २५५ शाळा बंद झाल्याने ग्रामीण शिक्षण धोक्यात!

       

मुंबई : राज्यातील मराठी शाळांबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून, गेल्या दोन वर्षांत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत तब्बल 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. या धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Marathi Granted Classical Status)

मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला नाही तसेच त्याबाबत कोणतेही धोरण आखण्यात आलेले नाही. दोन हजार मराठी शाळा अडचणीत असून 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. (Marathi Granted Classical Status)

मात्र, इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला वाढती पसंती मिळत असल्याने 255 शाळा बंद झाल्याची कबुली त्यांनी दिली. दरम्यान, काही अहवालांनुसार राज्यातील सुमारे 620 शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे हजारो शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 70 गावांत ‘ना शाळा, ना पाटी-पेन्सिल’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचीही चर्चा आहे. (Marathi Granted Classical Status)

ग्रामीण भागातील शाळा सर्वाधिक प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सरकारने उत्सव साजरा केला; मात्र प्रत्यक्षात मराठी शाळा वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका विविध स्तरांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखावे, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ आणि पालकवर्गातून जोर धरत आहे.


       
Tags: EducationInMaharashtraEducationMattersFarmersChildrenEducationLanguageAndEducationMarathiLanguageMarathiMediumPublicEducationCrisisRightToEducationRuralEducationCrisisSaveMarathiSchoolsSaveRuralSchoolsSchoolClosureSupportRuralStudents
Previous Post

वंचितांनी पुढे यावं आणि देशाचे नेतृत्व हाती घ्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

Next Post
जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार
बातमी

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

by mosami kewat
August 11, 2026
0

प्रस्ताव जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप; गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांचा सभागृहाच्या पायरीवर ठिय्या नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंचित...

Read moreDetails
लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

August 11, 2026
युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

August 11, 2026
धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन

धानोरा जहागीर व शिंदगीतील लाभार्थ्यांची मागणी; राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला निवेदन

August 11, 2026
जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा – राजेंद्र पातोडे

जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा – राजेंद्र पातोडे

August 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home