Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी ‘काळी दिवाळी’ साजरी करू – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

mosami kewat by mosami kewat
October 14, 2025
in बातमी
0
Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी 'काळी दिवाळी' साजरी करू - वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी 'काळी दिवाळी' साजरी करू - वंचित बहुजन आघाडीचा इशारा

       

मुंबई : पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त वेळकाढूपणा करत असून, शेतकऱ्यांचा बळी घेत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

यासंदर्भात ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राज्य सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. शासनाला केवळ वेळ काढायचा आहे आणि शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ही मागणी आम्ही वारंवार करत आहोत.”

सत्ताधारी आमदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा इशारा –

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीही प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात सत्ताधारी आमदारांच्या घरावर मोर्चे काढले होते. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रभरातील सर्वच सत्ताधारी आमदारांच्या घरावर मोर्चे काढायला भाग पाडू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

दिवाळीपर्यंत मदत न मिळाल्यास ‘काळी दिवाळी’ –

निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून मते घेऊन हे सत्तेवर आले, याची आठवण करून देत ऍड. आंबेडकर म्हणाले की, “शेतकऱ्यांना जर दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई मिळाली नाही, तर सर्वच सत्ताधारी आमदारांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी साजरी करू.”

शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई या ज्वलंत प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


       
Tags: AgricultureFarmerMaharashtramumbaiVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी 'काळी दिवाळी' साजरी करू - वंचित बहुजन आघाडीचा इशारा
बातमी

Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी ‘काळी दिवाळी’ साजरी करू – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

by mosami kewat
October 14, 2025
0

मुंबई : पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी वंचित...

Read moreDetails
अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू!

अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू!

October 14, 2025
दहशत आणि प्रतिसाद

दहशत आणि प्रतिसाद

October 14, 2025
पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये ABVP कडून आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांवर बहिष्काराचे पोस्टर्स; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोलिसांना निवेदन

पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये ABVP कडून आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांवर बहिष्काराचे पोस्टर्स; वंचित बहुजन युवा आघाडीचे पोलिसांना निवेदन

October 14, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर-शिक्षक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ‘संवाद’ बैठक!

स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर-शिक्षक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ‘संवाद’ बैठक!

October 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home