Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 12, 2025
in बातमी, मुख्य पान
0
औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

औरंगाबाद अतिक्रमण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश : १५० घरांचे पुनर्वसन निश्चित

       

औरंगाबाद – शहरातील आंबेडकरनगर, फुले नगर, आणि गौतम नगर परिसरातील अतिक्रमणाच्या कारवाईमुळे घरांवर टांगती तलवार आलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांनंतर अखेर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी १५० घरांच्या पुनर्वसनास मंजुरी दिली आहे.

या भागातील अतिक्रमण हटवताना अनेक गोरगरीब कुटुंबांच्या निवाऱ्यावर गदा येणार होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगळ यांनी जोरदार पाठपुरावा करत नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी १५० घरांचे पुनर्वसन निश्चित करत लवकरच त्या घरांच्या चाव्या संबंधित लाभार्थ्यांना सुपूर्त करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच अतिक्रमणाच्या कारवाईत पाडण्यात येणाऱ्या ‘कमान बुद्ध विहारा’बाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हे बुद्ध विहार पुन्हा नव्याने बांधून देण्यात येईल, असे आश्वासन स्वतः आयुक्त श्रीकांत यांनी दिले आहे.

या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. अमित भुईगळ यांनी याबाबत म्हटले, “आमचा लढा फक्त अतिक्रमणाविरुद्ध नाही, तर गरिबांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आहे. हे पुनर्वसन म्हणजे न्यायाचा विजय आहे.”

या निर्णयामुळे औरंगाबाद शहरातील नागरी प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेतील विश्वास नवी दिशा घेत आहे.


       
Previous Post

गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना: युवा टेनिसपटू राधिका यादवची वडिलांकडूनच हत्या

Next Post

म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

Next Post
म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

म्हाडा कोकण मंडळाची बंपर गृहनिर्माण लॉटरी : ५,००० हून अधिक घरे आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध! ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी
बातमी

औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी

by mosami kewat
January 9, 2026
0

चिकलठाणा : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला जोर लावला असून, चिकलठाणा परिसरात भव्य शक्तिप्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक...

Read moreDetails
औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली

औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली

January 9, 2026
औरंगाबादमध्ये 'वंचित'ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 9, 2026
एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात - सुजात आंबेडकर

एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर

January 9, 2026
औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ सुजात आंबेडकरांच्या हस्ते प्रसिद्ध

औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ सुजात आंबेडकरांच्या हस्ते प्रसिद्ध

January 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home