Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

mosami kewat by mosami kewat
December 16, 2025
in अर्थ विषयक, सामाजिक
0
आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

       

आपल्याला काय फरक पडतो ?

जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध झाले आहे.

तिकडे अमेरिकेत आर्टिफिशियल इंटीलिजन्स धुमाकूळ घालू लागले आहे; आपण तर इमाने इतबारे नोकरी करतो; आपल्याला काय फरक पडतो ?

रुपया घसरला ; आपण तर आयुष्यभर रुपयात सारे व्यवहार करतो, डॉलर काळा का गोरा हे देखील कधी बघितले नाही ; आपल्यला काय फरक पडतो ?

अमेरिका भारत (आणि इतर राष्ट्रांबरोबर देखील ) व्यापार करार होणार आहे म्हणे; आपण तर प्रगतिशील शेतकरी आहोत. आपल्याला काय फरक पडतो ?

असे बोलणारे अनेक जण असतात; पण वरकरणी , आपल्याशी डायरेक्ट संबंधित नसणाऱ्या, जागतिक स्तरावर आणि देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या अनेक मोठया घडामोडी , आज ना उद्या आपल्या मानगुटीला पकडतातच !

गेल्या काही दशकांच्या आर्थिक इतिहासावर नजर जरी टाकली तरी हे लक्षात येईल

ऐंशीच्या दशकात शिकागो स्कुलचे अर्थतज्ञ , जागतिक बँक, नाणेनिधी…बाजाराधिष्टित आर्थिक तत्वज्ञानावर चर्चा करत होते ; आपल्याला माहीतही नव्हते , त्यानंतर पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक देशात त्या नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानांवर आधारित अर्थव्यवस्थांचे पुनर्संघटन केले गेले

ऐंशीच्याच दशकात पर्सनल कॉम्प्युटर्स आले ; सरकारने काही फतवा नव्हता काढला कि कॉम्प्युटर नाही घेतला किंवा वापरला तर तुरुंगात टाकू ; पण ४० वर्षानंतर अगदी ग्रामीण भागातील ज्यांना चालवता येत नाही त्यांना देखील आपल्या पाल्याना कॉम्प्युटर आला पाहिजे हे कळले

नव्वदीच्या दशकात जागतिक बँक मायक्रो फायनान्स वर मांडणी करत होते ; १०० कोटींचा फंड तयार केला गेला ; मोहंमद युनूस ना नोबेल प्राईज दिले गेले ; आपल्याला माहित नव्हते. आज भारतातील नाही जगातील ५०० कोटी बॉटम ऑफ पिरॅमिड लोकसंख्या या भोवऱ्यात ओढली गेली आहे

याच सर्व काळात इंटरनेट , स्मार्टफोन , इंटरनेट बँकिंग , क्रिप्टो , युपीआय, सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक , व्हाट्सअप , इन्स्टा , ट्विटर , ऑनलाईन डेटिंग , पॉर्न्स, सॅटेलाईट्स , ओटीटी प्लॅटफॉर्म्स , ऑनलाईन रिटेल , वर्कर्सची नवीन कॅटॅगिरी : गिग वर्कर्स , शेकडो अँड्रॉइड बेस्ड ऍप्स … … … तुम्हीच काढा यादी

आपल्या २४ तासाच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या नाही तर अविभाज्य भाग झालेल्या यातील जवळपास सर्व गोष्टी हजारो किलोमीटर दूर , संख्येने अतिशय मूठभर असणाऱ्या व्यक्तींनी तयार केल्या / ठरवल्या / विकसित केल्या आहेत , आज देखील जात आहेत , नजीकच्या भविष्यात केल्या जातील

आपल्याला पहिल्यांदा वाटते हे सारे त्यांच्यासाठी म्हणजे प्रस्थापित, उच्च वर्गासाठी आहे , पण काही दिवसांनी कळते तो मोठा मोठा होत जाणारा आपल्याला, आपली परवानगी न घेता , कवेत घेणारा महाकाय भोवरा आपल्याला आतपर्यंत ओढून घेतो.

हे चांगले का वाईट , हे शोषक का मुक्तिदायी , हे चंगळवादी का आरोग्यदायी , हे नफेखोर कि चॅरिटेबल याबाबत जजमेंटल न होता याची किमान माहिती घेतली पाहिजे ; त्या क्षेत्रातील तंत्रज्ञ , विशेषज्ञ व्यक्तींना पाचारण करून समजवून घेतले पाहिजे. ऑथेटिंक माहिती, आकडेवारी, संकल्पना महत्वाच्या असतात.

मूल्यधरित, नैतिक जजमेंट त्याला पर्याय नाही. ते जजमेंट पास केले कि आपल्या मनाची , मेंदूची सारी कवाडे बंद होतात ; मग आपण तेच बघतो , तेच ऐकतो , तेच वाचतो , त्यांचेच ऐकतो जे आयडियॉलॉजिकली आपल्याला जवळचे आहे ; त्याने आपलेच नुकसान होते.


       
Tags: AIEffectDigitalTransformationEconomicApathyGigEconomyGlobal EconomicGlobalImpactKnowYourEconomyMicrofinanceSelfDestructiveMindsetTechRevolution
Previous Post

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

Next Post

हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Next Post
हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

हरेगावात १६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकरी कर्जमाफी योजना
article

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकरी कर्जमाफी योजना

by mosami kewat
March 10, 2026
0

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी २०२६-२७ सालासाठी अर्थसंकल्प जाहीर करताना राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा केली. अर्थसंकल्प जनहिताचा कसा आहे...

Read moreDetails
जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन

जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन

March 10, 2026
आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

आरएसएस मुख्यालयावर २३ मार्चला धरणे आंदोलन; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

March 10, 2026
देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

March 10, 2026
​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

March 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home